केतन अग्रवाल हत्या प्रकरणात सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्याची न्यायालयीन कोठडी लवकरच संपणार आहे. त्यानंतर त्यांना जामीन मिळणार की न्यायालयीन कोठडीत वाढ होणार हे पाहवे लागणार आहे. अशाच वेळी केतन अग्रवालचे वडील विशाल अग्रवाल हे पुन्हा एकदा समोर आले आहेत. त्यांनी या प्रकरणात एक मोठी मागणी केली आहे. शिवाय थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच पत्र लिहून या प्रकरणाता न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली आहे. त्यांनी पुण्यात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बोलताना त्यांना अश्रू अनावर झाले होते.
विशाल अग्रवाल यांनी सांगितले की सियाला कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहीजे. नुसती कठोर शिक्षा नाही तर लवकर शिक्षा झाली पाहीजे अशी मागणी केली आहे. केतन अग्रवालच्या हत्येमध्ये जेवढे लोक सहभागी आहेत त्या सर्वांना शिक्षा झाली पाहीजे असं ही ते म्हणाले. आपण याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे ही पत्र लिहून मागणी केली आहे. आपला न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे. त्यामुळे सिया आणि तिच्या साथिदारांना शिक्षा मिळणारच आहे असं ही ते म्हणाले. यावेळी त्यांनी सियाच्या आईवडीलांवरही गंभीर आरोप केले आहेत.
सियाचे आई वडील सध्या दुटप्पी भूमीक घेत आहेत. एकीकडे ते सियाला शिक्षा व्हावी अशी मागणी करत आहेत तर दुसरीकडे तिला चांगल्यातले चांगले वकील देत आहेत असं विशाल अग्रवाल म्हणाले. त्यामुळे या प्रकरणात तिच्या कुटुंबाचीही चौकशी झाली पाहीजे असं त्यांनी सांगितलं. आपले नातेवाीक असलेले नरेंद्र मित्तल आणि रेणू मित्तल यांनी आपली फसवणूक केली असा आरोप त्यांनी केला. मित्तल कुटुंबीयांनीच सियाचे स्थळ केतनसाठी आणले होते. त्यांना सियाची सर्व पार्श्वभूमी माहित होती. तरही त्यांनी हे लग्न लावून देण्याचा आग्रह केला होता. आमचे ते नातेवाईक होते. तरी ही त्यांनी आम्हाला फसवलं. त्यांनी असं का केलं हे समजायला मार्गा नाही. या सर्वा मुळे आज माझा मुलगा केतन आमच्यात नाही. तो गेल्याने त्याचा धक्का आपल्या वडीलांना ही सहन झाला नाही.
त्यामुळे सतरा दिवसानंतर त्यांचे ही निधन झाले असं ही विशाल अग्रवाल यांनी सांगितलं. या सर्वाला जे जबाबदार आहे त्या प्रत्येकाला शिक्षा मिळालीच पाहीजे असं ते म्हणाले. ज्या मित्तल यांनी केतनसाठी स्थळ आणलं होतं. त्याचं पुण्याच्या मार्केट यार्डमध्ये तेलाचा व्यापार आहे अशी माहित अग्रवाल यांनी दिली. सिया पोलिस कोठडी वाट्टेल तशी वागत होती ही लाज आणणारी गोष्ट आहे असं ही ते म्हणाले. आपला मुलगा गेला पण पुढे कुणाचा ही केतन अग्रवाल होवू नये अशी अपेक्षा आहे. त्यामुळे समाजातील प्रत्येक व्यक्तीने आपल्या मुलांवर चांगले संस्कार करावे. ते काय करतात काय करत नाही यावर लक्ष ठेवावे. त्यांची काळजी घ्यावी, जेणे करून आणखी कोणी केतन अग्रवाल होणार नाही. असं ही त्यांनी स्पष्ट केलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world