Sharad Pawar: जयंत पाटील यांच्याबाबत शरद पवारांची भूमिका ठरली, कार्यकर्त्यांना जाहीरपणे सांगितली

शरद पवार यांनी म्हटलं की, आनंद या गोष्टीचा आहे की संघर्षाच्या काळात जयंत पाटील यांनी प्रभावीपणे काम केले. जयंत पाटील यांनी मला सांगितलं की नव्या पिढीला संधी द्या. तुम्ही आम्ही सगळे त्यांच्या मागे उभे राहुया.

जाहिरात
Read Time: 2 mins

Sharad Pawar on jayant Patil : राष्ट्रवादी काँग्रेसच्या 26 व्या वर्धापन दिन सोहऱ्यात जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदावरून मुक्त करण्याची विनंती शरद पवारांकडे केली आहे. शरद पवारांनी जयंत पाटलांचा राजीनामा अद्याप स्वीकारला नसल्याचे वृत्त समोर येत आहे. तर प्रमुख सहकाऱ्यांना एकत्र घेऊन चर्चा करून यासंदर्भातील निर्णय घेऊ, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

शरद पवार यांनी म्हटलं की, आनंद या गोष्टीचा आहे की संघर्षाच्या काळात जयंत पाटील यांनी प्रभावीपणे काम केले. जयंत पाटील यांनी मला सांगितलं की नव्या पिढीला संधी द्या. तुम्ही आम्ही सगळे त्यांच्या मागे उभे राहुया. यासंबंधीचा विचार करण्याची तयारी त्यांची आहे, तुमची मानसिकता वेगळी आहे. मी इतकंच सांगू इच्छितो की या विषयावर प्रमुख सहकाऱ्यांना एकत्र घेऊन सुसंवाद साधू आणि सामूहिकपणाने यासंदर्भातील निर्णय घेऊ. निर्णय घेत असताना प्रत्येक जिल्हा, तालुका नवे चेहरे दिसले पाहिजे. आपण उभे केले आणि त्यांना शक्ती देत आहोत. 

Advertisement

(नक्की वाचा - Jayant Patil : राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात मोठा ड्रामा, जयंत पाटलांनी उडवून दिली खळबळ)

कर्तृत्व असलेले हजारो कार्यकर्ते आपल्या पक्षात आहेत. त्यांना संधी देऊया, प्रतिष्ठा देऊ मार्गदर्शन देऊ आणि त्यातून राज्य चालवण्याची कुवत असलेले नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस देऊ शकतो, असा इतिहास निर्माण करायचा आहे. दोन-तीन महिन्यात निवडणुका येतील, त्यात जिल्ह्याच्या नेतृत्वाला विश्वासात घेऊन निवडणुका कशा लढायच्या, एकट्याने का कोणाला सोबत घेऊन लढायच्या याचा विचार त्या जिल्ह्याच्या नेतृत्वाला विश्वासात घेऊन करण्याची वेळ आली आहे. असं झाल्यास नव्या नेतृत्वाची फळी जिल्ह्याजिल्ह्यात दिसेल. पुढचे तीन महिने तुमच्या भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नवे नेतृत्व कसे आणायचे, महिलांना पुढे कसे आणायचे याबद्दल विचार करा, असं शरद पवार यांनी म्हटलं. 

Advertisement

(नक्की वाचा-  'आम्ही एका ताटात जेवलो, ते विसरले असतील पण मी नाही विसरणार', NCP वर्धापनदिन सोहळ्यात सुप्रिया सुळेंचा टोला)

काय म्हणाले होते जयंत पाटील?

जयंत पाटील यांनी म्हटलं की, शरद पवार यांनी मला प्रदेशाध्यक्षपदाची बरीच संधी दिली. सात वर्षांचा मोठा कालवधी मला मिळाला. शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणे आवश्यक आहे. तुम्हा सर्वांदेखत साहेबांना विनंती करेन, शेवटी पक्ष पवार साहेबांच्या आहे. पवार साहेबांनी यावर योग्य निर्णय घ्यावा. आपल्याला बरेच पुढे जायचे आहे. जयंत पाटलांनी राजीनाम्याबाबत वक्तव्य करण्याआधीच उपस्थित कार्यकर्त्यांना गोंधळ घालायला सुरुवात केली. त्यामुळे जयंत पाटील यांचं बोलणं अपूर्णच राहिलं. 

Advertisement

Topics mentioned in this article