12 IAS Officers Transferred: महाराष्ट्र सरकारने मंगळवारी (16 जून) एक मोठा प्रशासकीय फेरबदल करत प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या आहेत. वरिष्ठ अधिकारी विजय सिंघल आणि अश्विनी जोशी यांच्यासह एकूण 12 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या अंतर्गत धारावी पुनर्विकास प्रकल्प, सिडको, एमएमआरडीए, एमआयडीसी आणि बीएमसी यासारख्या प्रमुख संस्थांमध्ये महत्त्वपूर्ण नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
कोणावर सोपवण्यात आली कोणती जबाबदारी
सामान्य प्रशासन विभागाने (जीएडी) जारी केलेल्या बदली आदेशानुसार, नगर विकास, उद्योग, आरोग्य, वन आणि जिल्हा प्रशासन विभागांतील अधिकाऱ्यांवर नवीन जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र शहर आणि औद्योगिक विकास महामंडळाचे (सिडको) उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक (एमडी) म्हणून कार्यरत असलेले विजय सिंघल यांची मुंबईतील धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हा राज्य सरकारचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे.
प्राजक्ता वर्मा यांची बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) अतिरिक्त महानगरपालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे (एमआईडीसी) मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून कार्यरत असलेले पी. वेलरासू यांची महसूल आणि वन विभागात सचिव (वन) पदावर बदली करण्यात आली आहे.
यासोबतच सरकारने आयएएस अधिकारी अश्विनी जोशी, दीपेंद्र सिंह कुशवाहा, अश्विन मुद्गल, कादंबरी बलकवडे आणि संजय काटकर यांच्याही बदल्या केल्या असून त्यांच्यावर अनुक्रमे एमएमआरडीए, एमआयडीसी, सिडको, उद्योग संचालनालय आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) यासारख्या प्रमुख संस्थांमध्ये नवीन जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत.
तसेच सरकारने जेनिथ चंद्रा दोंथुला आणि अनय नावंदर यांची अनुक्रमे गोंदिया आणि अकोला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पदावर नियुक्ती केली आहे तर बी. सरवनन आणि लघिमा तिवारी यांची अनुक्रमे किनवट (नांदेड) आणि तळोदा (नंदुरबार) येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे (आयटीडीपी) प्रकल्प अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.
(Content Source PTI)