
राजा रघुवंशी हत्या प्रकरणात आता नवा ट्वीस्ट समोर आला आहे. राजाची पत्नी सोनम रघुवंशीचा (Sonam Raghuwanshi) पहिला जबाब समोर आला आहे. सोनमने पोलिसां समोर सरेंडर केल्यानंतर काही खुलासे केले आहेत. ते तर अधिक धक्कादायक आहेत. तिने पोलिसांना सांगितलं की, आपला पती राजा रघुवंशीची हत्या अज्ञात लोकांनी केली आहे. शिवाय पतीची हत्या केल्यानंतर अज्ञात लोकांनी मला पळवून नेलं होतं. त्यानंतर एका खोलीत बंद करून ठेवलं होतं असा दावा सोनम रघुवंशी हिने पोलिसां समोर केला आहे. त्यानंतर तिला एका गाडीत बसवून ढाब्यावर सोडून दिलं. तिच्या या जबाबाने या प्रकरणात नवा ट्वीस्ट निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. सोनमला पोलिसांनी उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथून अटक केली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सोनम रविवारी रात्री उत्तर प्रदेशातल्या एका ढाब्यावर पोहोचली होती. जिथे तिने ढाब्याच्या मालकाकडून मोबाईल घेऊन आपल्या भावाला फोन केला. त्यानंतर तिथे पोलिस आले. त्यांनी तिला अटक केली. सोनम सध्या गाझीपूरमध्ये असून, पोलिस तिला न्यायालयात हजर करणार आहे. त्यानंतर मेघालय पोलिस तिला घेऊन जातील. राजा रघुवंशी हत्या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत राज कुशवाह, विशाल उर्फ विक्की ठाकूर, आकाश राजपूत यांना अटक केली आहे. राज आणि विशाल इंदूरचे तर आकाश ललितपूर (उत्तर प्रदेश) येथील रहिवासी आहेत. चौथा आरोपी सोमवारी सागर जिल्ह्यातील बीना येथून पकडला गेला आहे.
राजा रघुवंशी हत्ये प्रकरणी सोनम रघुवंशी ही प्रमुख आरोपी आहे. सर्व हत्येचा कट तिनेच रचल्याचा तिच्यावर संशय आहे. त्यात तिने आता पलटी मारली आहे. आपण ही हत्या केली नसल्याचा तिचा दावा आहे. पण मेघालयच्या मंत्र्यांनी पोलिस तपासाच्या अधारे हा लव्ह ट्रँगल असल्याचं सांगितलं आहे. शिवाय या हत्येची मुख्य सुत्रधार सोनमच असल्याचा मेघालय पर्यटन मंत्र्यांनी दावा केला आहे. त्यामुळे हे प्रकरण आणखी किचकट होण्याची दाट शक्यता आहे. सोनम खरं बोलत आहे की खोटं याचा शोध आता पोलिसांना घ्यावा लागणार आहे.
11 मे रोजी इंदूरचे ट्रान्सपोर्ट व्यावसायिक राजा रघुवंशी यांचं सोनमशी अरेंज्ड मॅरेज झालं. त्यानंतर 20 मे रोजी ते गुवाहाटीला पोहोचले. 22 मे रोजी हनिमूनसाठी शिलाँगला पोहोचले. दोघे शिलाँगच्या मावलखियाट गावात शिपारा होम स्टेमध्ये थांबले होते. त्याच दिवशी हॉटेलमधून आपलं सामान ठेवून स्कूटीवर फिरण्यासाठी ही निघाले. 23 मे रोजी दोघे ही अचानक गायब झाले. या घटनेनंतर कुटुंबीयांनी इंदूरमध्ये पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर मेघालयच्या शिलाँग पोलिसांना माहिती दिल्यावर दोघांचा शोध सुरू झाला. या दरम्यान 24 मे रोजी त्यांची स्कूटी सोहरारिममध्ये दिसली. अनेक दिवस चाललेल्या शोधमोहिमेनंतर, 2 जून रोजी राजा रघुवंशीचा मृतदेह सापडला होता. मृतदेहाजवळ एक शस्त्र सापडलं होतं. डोक्यावर घाव केल्यामुळे राजाचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदनातून स्पष्ट झालं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world