जाहिरात

Raja Raghuvanshi Death : सोनमला फसवलं जातंय का? पोलिसांना शोधायची आहेत या प्रश्नांची उत्तरे

Raja Raghuvanshi Murder Case : पोलिसांच्या चौकशीनुसार, सोनम म्हणत आहे की तिचे अपहरण झाले होते. ती स्वतः एक पीडित आहे. सोनमचे कुटुंबीयही तेच म्हणत आहेत.

Raja Raghuvanshi Death : सोनमला फसवलं जातंय का? पोलिसांना शोधायची आहेत या प्रश्नांची उत्तरे

Raja Raghuvanshi Murder Case : राजा रघुवंशी हत्या प्रकरणाने संपूर्ण देशाला हादरवून टाकले आहे. हनिमूनला गेलेल्या राज रघुवंशीचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली होती. मात्र राजाच्या हत्येची त्याची पत्नी सोनम हिचाचा हात असल्याचं बोललं जात असल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. सर्व पुरावे, घटनाक्रम आणि साक्षीदार सोनम रघुवंशी विरोधात आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

लग्नानंतर सोनम तिचा पती राजा रघुवंशी सोबत हनिमूनसाठी मेघालयला गेली होती. तिथे दोघेही बेपत्ता झाल्याची बातमी आधी समोर आली. त्यानंतर एके दिवशी राजाचा मृतदेह सापडला. मात्र सोनम कुठेच सापडली नाही. मेघालयापासून इंदूरपर्यंत या घटनेने सर्वांचंच मन सुन्न झालं. पोलीस रात्रंदिवस सोनमच्या शोधात गुंतले होते. 

मात्र काही दिवसांनी प्रकरणात असा ट्विस्ट येतो, जो चित्रपटांमध्येही क्वचितच पाहायला मिळतो. सोनम अचानक मेघालयपासून सुमारे 1200 किलोमीटर अंतरावर असलेल्या गाझीपूर, यूपीमध्ये एका ढाब्यावर सापडते. ती प्रथम तिच्या घरच्यांना फोन करुन याबाबत माहिती देते. यावेळी ती रडत होती. घाबरलेल्या कुटुंबीयांनी देखील तातडीने पोलिसांना  याची माहिती दिली. राजाच्या हत्येचा संपूर्ण टाईमलाइन पाहिला तर संशयाची सुई पूर्णपणे सोनमवर आहे. सोनमच बेवफा झाल्याची चर्चा आहे. सोशल मीडियावर प्रत्येकजण हेच म्हणत आहे.

(नक्की वाचा - Sonam Raghuvanshi: ज्या 'राज'साठी राजाचा जीव गेला , तोच आला समोर, खतरनाक प्रेम कहाणी)

मात्र असे बरेच प्रश्न आहेत, ज्यामुळे संशयाची सुई सोनमकडे जाते. तिचा पती राजाची हत्या झाल्यानंतर ती 17 दिवस गप्प का राहिली? जेव्हा तिच्या पतीचा मेघालयात मृत्यू झाला, तेव्हा ती 1200 किमी अंतरावर असलेल्या गाजीपूरला कशी पोहोचली? तिने तिचा बॉयफ्रेंड असल्याचे सांगितले जाणारे राज कुशवाहाद्वारे राजाची हत्या घडवून आणली का? सोनमने सुनियोजित कट रचत राजाला मारले का? तर आतापर्यंतची टाइमलाइन आणि पोलिसांचे दावे यावरून सोनमनेचे राजाची हत्या केल्याची चर्चा आहे. 

(नक्की वाचा - Sonam Raghuvanshi: हनिमूनपासून हत्येपर्यंत! सोनम रघुवंशीनेच रचला होता हत्येचा कट? जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम)

पोलिसांच्या चौकशीनुसार, सोनम म्हणत आहे की तिचे अपहरण झाले होते. ती स्वतः एक पीडित आहे. सोनमचे कुटुंबीयही तेच म्हणत आहेत. त्यामुळे या  प्रकरणात आणखी एक ट्विस्ट येणार आहे का? हत्येत तिसरा कुणाचा हात आहे का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे पोलिसांना मिळवायची आहेत. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com