Latur News: 50 रुपयांची उधारी मागायला गेले, त्यांच्यावरच चाकूने सपासप वार केले, पुढे भयंकर घडलं

करणच्या कमरेवरही चाकुचे वार करून त्यालाही जखमी केले. हा सर्व प्रकार रस्त्यावर घडला. सर्व जण हे बघत होते.

जाहिरात
Read Time: 2 mins
लातूर:

त्रिशरण मोहगावकर 

50 रुपयांच्या उधारी वरून लातूरमध्ये एकाला आपला जीव गमवाला लागला आहे. तर  दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. भर दिवसा घडलेल्या या घटनेनं सर्वत्र खळबळ उडाली आहे. लातूरच्या बाबुळगाव रोडवरील म्हाडा कॉलनी येथे बालाजी गायकवाड यांची पानपट्टी आहे. या ठिकाणीच राहाणारे शेख शहजाद आणि शेख अब्बास यांनी  50 रुपयांचा पान मसाला घेतला. मात्र त्याचे पैसे त्यांनी दिले नाहीत. त्यामुळे बालाजी यांनी त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. त्यावरून तिथे वाद झाला. शिवाय पैसे न देता शेख शहजाद आणि शेख अब्बास तिथून निघून गेले.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

या घटनेनंतर बालाजीचे नातेवाईक देवीदास गायकवाड, रंजना गायकवाड, गणेश सुर्यवंशी, करण काळुंके हे सर्वजण शेख अब्बास व शेख शहजाद यांच्या घराकडे त्यांना जाब विचारायला गेले. पण त्यावेळी त्यांचे घर बंद होते. परत जात असताना वाटत या सर्वांना ते दोघे जण दिसले. त्यावेळी देवीदास यांनी त्या दोघांना पैसै का दिले नाहीत याचा जाब विचारला. शिवाय बालाजीला पान मसाल्याचे पैसे का दिले नाही अशी विचारणा ही केली. तुम्ही त्रास का देत आहात असं ही विचारलं. अशी विचारणा केल्यानंतर शेख शहजाद आणि शेख अब्बास हे दोघे ही भडकले. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Air India Plane Crash: आईच्या एका शब्दाने लेकाचा जीव वाचला! यमन व्यासची मृत्यूला हुलकावणी देणारी कहाणी

तुम्हीच आम्हाला त्रास देत आहात. तुम्ही आमच्या नादी लागू नका. मी तुम्हाला मारून टाकेन अशी धमकी शेख शहजाद आणि शेख अब्बास या दोघांनी गायकवाड यांना दिली. ते तेवढ्यावरच थांबले नाहीत तर कमरेला असलेला सुरा काढून देवीदास गायकवाड यांना त्याने भोकसले. त्यांना सोडविण्यासाठी गणेश सुर्यवंशी गेला असता त्यांच्या छातीत व पाठीवर  चाकूचे वार करून शहजादने त्याला ही गंभीर जखमी केले. तर  शहजादचा भाऊ अब्बासने राजु काळुंके यांच्या हातावर कोयत्याने वार केले. त्यात राजू ही गंभीर जखमी झाला. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Sonam Raghuvanshi: सोनमनं दिला राजाचा नरबळी? राजा रघुवंशी हत्या प्रकरणात तंत्र-मंत्रचा अँगल

करणच्या कमरेवरही चाकुचे वार करून त्यालाही जखमी केले. हा सर्व प्रकार रस्त्यावर घडला. सर्व जण हे बघत होते. मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली होती. त्याच वेळी म्हाडा कॉलनीतील शुभम बदनाळे हे आपल्या मोटार सायकलवर घटना स्थळी आले. त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारा दरम्यान गणेश  सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला. तर बाकीच्यांवर उपचार सुरू आहेत. शेख शहजाद आणि शेख अब्बास यांना पोलीसांनी तात्काळ अटक केली आहे. 

Advertisement