
अंधश्रद्धा निर्मुलन कायदा महाराष्ट्रात आहे. जादूटोणा, करणी, भोंदूगीरी या सारख्या अंधश्रद्धांना पायबंद बसावा यासाठी हा कायदा केला गेला. पण त्याचा काही एक परिणाम होताना दिसत नाही. गेल्या काही दिवसापूर्वी कोल्हापूरात भर दिवसा स्मशानात अघोरी पुजा केली जात असल्याचं समोर आलं होतं. त्याला काही दिवस होत नाही तोच आता सांगलीच्या मिरजेत ही अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मिरजेत जादूटोणा करण्याचा प्रकार समोर आला आहे. हा जादूटोणा वाढदिवसाच्या बॅनर खाली करण्यात आला. त्या ठिकाणी कापडात बांधलेली छोटी गाठोडी दिसून आली. विशेष म्हणजे गेली तीन दिवस वेग वेगळी गाठोडी या बॅनर खाली ठेवण्यात आली होती. मिरजमध्ये जनसुराज्य शक्ती पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष डॉक्टर पंकज म्हेत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त डिजिटल बॅनर लावण्यात आले होते. त्याच बॅनववर जादूटोणा करण्याचा प्रकार समोर आला आहे.
वखार भाग माळी समाजाची स्मशानभूमी आहे. या स्मशानभूमी जवळच हे बॅनर लावण्यात आले होते. या बॅनर खाली तीन दिवस झाले कोणी तरी आज्ञात व्यक्ती ही छोटी गाठोडी टाकून गेला आहे. छोट्या गाठोड्यात जादूटोणा केलेले साहित्य असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे नागरिकांनी भीती पोटी त्यांना हात लावला नाही. मात्र त्यांनी ही बाब डॉ पंकज म्हेत्रे यांना दिली. पहिल्या दिवशी हिरवा रंगाचे,दुसऱ्या दिवशी लाल आणि तिसऱ्या दिवशी केशरी रंगाचे हे गाठोडे टाकण्यात आले होकते.
याबाबत अनिस संघटनेच्या पदाधिकारी ज्योती आदाटे याच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यांनाहा सर्व प्रकार अंधश्रद्धेचा असल्याचं म्हटलं आहे. भारत पाकिस्तान युद्धामध्ये भारताने मिसाईल टाकण्यापेक्षा असली गाठोडी करून टाकली असती तर बरं झालं असतं अशी प्रतिक्रीयाही त्यांनी दिला आहे. अशा अंधश्रद्धांवर विश्वास ठेवू नये असेही त्यांनी आवाहन केले आहे. शिवाय या घटनांमुळे कुणीही घाबरून जाण्याचे कारण नाही असं ही त्या यावेळी म्हणाल्या.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world