जाहिरात

मम्मी पाहत होती! ऊशी घेऊन काशी आला आणि... चिमुरड्याच्या जबाबामुळे आईच अडकली

Horrific Alwar Murder: राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील खेरली भागात 7 जून रोजी झालेल्या हत्येप्रकरणात 9 वर्षाच्या चिमुरड्याने दिलेली जबानी निर्णायक ठरली आहे. या मुलाच्या आईनेच त्याच्या वडिलांना ठार मारण्यासाठी सुपारी दिली होती.

मम्मी पाहत होती! ऊशी घेऊन काशी आला आणि... चिमुरड्याच्या जबाबामुळे आईच अडकली
The motive behind the murder, police say, was an extramarital affair.
  • A nine-year-old boy is the key witness in his father's alleged murder in Rajasthan.
  • The victim, Veeru Jatav, was found dead at home; his wife initially claimed he fell ill.
  • Three suspects, including the mother and her lover, have been arrested.
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
अलवर:

राजस्थानातील खेरलीचा रहिवासी असलेल्या वीरू उर्फ ​​मनसिंग जाटव याचा मृत्यू झाला होता. वीरूची तब्येत अचानक बिघडली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाल्याचे वीरूची बायको अनिताने सांगितलं होतं. मात्र पोलिसांना तिच्या सांगण्यावर विश्वास बसत नव्हता. पोलिसांनी पुढील 48 तासांत वीरूच्या हत्येमागचे कारण आणि आरोपी शोधून काढले. वीरूच्या 9 वर्षांच्या मुलाची जबानी पोलिसांच्या तपासाला दिशा देणारी ठरली.  वीरूच्या मुलाने जे सांगितलं ते ऐकल्यानंतर पोलिसांनी अवघ्या काही तासांत मुख्य आरोपी गजाआड केले. आरोपींमध्ये वीरूची बायकोही असून तीच मुख्य सूत्रधार निघाली.  

वीरूच्या मुलाने पोलिसांना दिलेल्या जबानीत सांगितले की, त्याच्या आईने म्हणजेच अनिताने घराचा दरवाजा मुद्दाम उघडा ठेवला होता. मध्यरात्रीच्या सुमारास काहीजण या दरवाजातून घरात घुसले. यामध्ये 'काशी' अंकल देखील होता.  

काशी अंकल आणि त्याच्यासोबत आलेल्यांनी पप्पांना मारहाण केली आणि नंतर त्यांच्या तोंडावर उशी दाबली. मी पप्पांच्या जवळच झोपलो होतो, मी डोळे किलकिले करून सगळं बघितलं मात्र घाबरल्याने झोपेचं नाटक केलं असं वीरूच्या मुलाने पोलिसांना सांगितलं. 

वीरूच्या मुलाने सांगितलं की दाराचा थोडा आवाज झाल्याने माझं दरवाजाकडे लक्ष गेलं होतं. मी पाहिलं तेव्हा माझी आई दरवाजा उघडत होती आणि काशी अंकल बाहेर उभा होता. त्याच्यासोबत आणखी 4 जण होते. मी झोपेचं नाटक करून बघत होतो. मी पाहिलं तेव्हा आई पलंगासमोर उभी होती, त्या लोकांनी पप्पांना मारहाण केली, त्यांचे पाय पिरगळले आणि गळा दाबला. काशी काकांनी उशी घेतली आणि त्यांच्या तोंडावर दाबली.

मी उठून बसलो आणि पप्पांना हात लावायला गेलो. तेव्हा काशी अंकलने मला मांडीवर घेतलं आणि रागावून धमकावलं. त्यामुळे मी घाबरलो होतो, थोडावेळाने पप्पा निपचित पडले होते आणि मग सगळे निघून गेले.  

पोलिसांना तपासादरम्यान कळालं की अनिता आणि काशीचे अनैतिक संबंध होते, वीरूचा अडसर दूर करण्यासाठी त्यांनी त्याला ठार मारण्याचं ठरवलं होतं. अनिता खेरलीमध्ये किराणा मालाचे दुकान चालवायची तर काशीराम रस्त्यावर कचोरी विकायचा. कचोरी देता-घेता अनिता आणि तो प्रेमात पडले होते. या दोघांनी वीरूला ठार मारण्यासाठी चार जणांना सुपारी दिली होती. यासाठी 2 लाख रुपये खर्च करण्यात आले होते. वीरूचे पोस्टमॉर्टेम करण्यात आले तेव्हा त्याला मारहाण झाल्याचं दिसून आले होते आणि त्याचा मृत्यू गुदमरल्याने झाल्याचेही दिसून आले होते.  पोलिसांनी या प्रकरणात अनिता, काशीराम आणि ब्रिजेश जाटव नावाच्या मारेकऱ्याला अटक केली आहे. उर्वरित तीन आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com