Nagpur News: 'या' कारणामुळे नागपूर दंगलीचा मुख्य आरोपी फईम खान याचा जामीन अर्ज फेटाळला

फईम खानने वेगवेगळ्या लोकांना चिथावणीखोर व्हॉइस मेसेजेस पाठवून समाजात तेढ निर्माण केली होती.

जाहिरात
Read Time: 2 mins
नागपूर:

नागपूर दंगल प्रकरणात अटकेत असलेल्या मुख्य आरोपी फईम खान याचा जामिनाचा अर्ज अर्ज फेटाळण्यात आला आहे. नागपूरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने आज नामंजूर केला आहे. नागपूर दंगली प्रकरणी गणेशपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्या अंतर्गत फईम खानला अटक करण्यात आली होती. या प्रकरणात न्यायालयाने स्पष्टपणे नमूद केलं की, फईम खान हा या दंगलीचा मुख्य सूत्रधार आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

नागपूरमध्ये ज्या दंगली झाल्या त्याचा मुख्य सुत्रधार हा फईम खान आहे. त्याच्या चिथावणीमुळेच ही घटना घडली, असे निरिक्षण कोर्टाने नोंदवले आहे. शिवाय अशा आरोपीस जामिनावर सोडल्यास तपासावर परिणाम होऊ शकतो असं न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. त्याच बरोबर तो साक्षीदारांवर दबाव निर्माण होऊ शकतो. त्यातून तपासात अडथळा येऊ शकतो, असंही न्यायालयाने जामीन नाकारताना म्हटलं आहे. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Vaishnavi Hagawane: वैष्णवीच्या आईवडिलांनी लेकीच्या लग्नात किती खर्च केला? आकडा पाहून डोळे होतील पांढरे

फईम खानने वेगवेगळ्या लोकांना चिथावणीखोर व्हॉइस मेसेजेस पाठवून समाजात तेढ निर्माण केली होती. त्यामुळे नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात दंगल उसळली.  अशा आरोपीला जामीन देणं योग्य नाही, असं मत कोर्टाने व्यक्त केलं आहे.  सरकारतर्फे मुख्य जिल्हा सरकारी वकील नितीन तेलगोटे यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. फईम खान याला जामीन मिळाल्यास तो पुन्हा अशाच प्रकारच्या दंगली घडवू शकतो. या आधीही त्याच्यावर अशा प्रकारचे गुन्हे नागपूरमधील वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये नोंदवले गेले आहेत. दोन्ही कडच्या बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने फईम खान याचा जामीनाचा अर्ज नामंजूर केला आहे.

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Vaishnavi Hagawane: वैष्णवीची आत्महत्या की खून? 'ही' गोष्ट निर्णायक ठरणार! डॉक्टरांनी सांगितली मोठी माहिती

17 मार्चच्या रात्री नागपूरात ही दंगल उसळली होती.  रात्री दोन गटात जोरदार राडा झाला. त्यानंतर मोठा तणावर नागपूरात दिसून आला होता. नागपूर शहरातील महाल भागात ही घटना घडली होती. यावेळी मोठ्या प्रमाणात दगडफेक आणि गाड्यांची फोडतोड करण्यात आली होती. शिवाय काही गाड्या ही जाळण्यात आल्या होत्या. या प्रकरणी 80 पेक्षा जास्त जणांना ताब्यात घेण्यात आले होते. 

Advertisement