Nagpur Violence : नागपूर दंगलीच्या कटाची थिअरी खोटी? पोलीस आयुक्तांनी दिली वेगळीच माहिती

Nagpur Violence Incident News : आज संसदेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी हा नागपुरातील कट सुनियोजित असल्याचा संशय व्यक्त केला, मात्र प्रत्यक्षात पोलीस आयुक्तांनी वेगळीच माहिती दिली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Nagpur Violence : 17 मार्चची सायंकाळ नागपुरकरांसाठी एक मोठं संकट घेऊन आली. आतापर्यंत सर्व समाजाचे लोक एकोप्याने राहणाऱ्या नागपुरात दंगल उसळली. या दंगलीनंतर महाराष्ट्रभरातून संतापाच्या प्रतिक्रिया येत आहे. या दंगलीमध्ये 33 पोलीस अधिकारी आणि तीन उपायुक्त दर्जाचे अधिकारी जखमी झाले आहेत. दंगलखोर सर्वसामान्यांच्या घरात शिरल्याचंही सांगितलं जात आहे. सध्या सुरक्षेच्या कारणास्तव नागपुरातील काही भागात कर्फ्यू लावण्यात आला आहे.

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

आज अधिवेशनात नागपूर दंगलीवरुन गोंधळ पाहायला मिळाला. अशा प्रकारे दंगल उसळणे ही सत्ताधाऱ्यांची नामुष्की असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. नागपूर दंगलीबाबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा पूर्वनियोजित कट असल्याचा संशय व्यक्त केला आहे. मुख्यमंत्र्यांनी संसदेत दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी दोन ट्रॉली भरून दगड सापडले आहेत. याशिवाय अनेक शस्त्रंही सापडल्याचं त्यांनी सांगितलं. 

Advertisement

Advertisement

नक्की वाचा - Nagpur Violence : नागपूर दंगल रोखता आली असती का? पोलिसांचं नेमकं काय चुकलं?

दरम्यान या प्रकरणात एक अत्यंत मोठी बातमी समोर येत आहेत. नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी वेगळीच बातमी दिली आहे. नागपूरची दंगल सुनियोजित नसल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. घटनास्थळावर दगडाने भरलेली गाडी ही नागपूर महानगरपालिकेची आहे. ती गाडी स्वच्छतेसाठी तिथं आली होती. त्या परिसरात बांधकाम सुरू होतं. त्यामुळे हे दगड बांधकाम सुरू असलेल्या त्या भागातील असल्याचं पोलीस आयुक्तांनी सांगितलं. याशिवाय अद्याप तरी दंगलीसाठी बाहेरून कोणी आल्याचं समोर आलेलं नाही. आतापर्यंत स्थानिक लोक आढळून आल्याचं दिसून येत असल्याचंही पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल म्हणाले. 

आयुक्तांनी सांगितल्यानुसार, नागपुरात तहसिल आणि गणेशपेठ या भागात आणि आजूबाजूच्या पाच किलोमीटर अंतरावर तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. या परिसरातील 11 पोलीस ठाण्यात कर्फ्यू लावण्यात आले आहेत. आतापर्यंत पाच एफआयआर दाखल करण्यात आले असून 50 हून जास्त अटक करण्यात आले आहे. या दंगलीत 34 पोलीस अधिकारी जखमी झाले आहेत. दोन उपायुक्त दर्जाचे पोलीस अधिकारी रुग्णालयात दाखल असल्याचं आयुक्त म्हणाले. सोशल मीडियावर कोणतंही वक्तव्य करताना अधिक सजगतेने करावं. दोन समाजात तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी असंही ते यावेळी म्हणाले.  

Advertisement