Navi Mumbai News: महिलेला डिजिटल अरेस्ट, 1 कोटी 81 लाख लुटले, नवी मुंबई पोलिसांची एन्ट्री अन्...

हे आरोपी बनावट इंटरनॅशनल कॉल सेंटर चालवत होते. देशभरात त्यांच्याविरुद्ध 73 ऑनलाईन फसवणुकीचे गुन्हे नोंदवले गेले आहेत.

जाहिरात
Read Time: 3 mins
नवी मुंबई:

डिजिटल अरेस्टच्या घटना अलिकडच्या काळात वाढत आहेत. सरकारकडून सावधतेचा इशार दिल्यानंतरही अनेक जण या डिजिटल अरेस्टला बळी पडतात. त्यातून कुणाला लाखो तर कुणाला कोट्यवधींचा गंडा लागतो. आपली फसवणूक झाली आहे हे समजेपर्यंत मात्र खुप उशिर झालेला असतो. अशीच एक घटना नवी मुंबईत समोर आली आहे. एक महिलेला सायबर भामट्यांनी डिजिटल अरेस्ट करत तब्बल 1 कोटी 81 लाख रुपयांना लुटल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी मोठ्या मेहनतीने या सायबर भामट्यांना गडाआड केले आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

नवी मुंबईत राहात असलेल्या एका महिलेला डिजिटल अरेस्ट करण्यात आली होती. त्यांना 14 आणि 15 जानेवारीला एक कॉल आला होता. हा कॉल वॉट्सअप कॉल होता. तुमचा एका ईडीच्या केसमध्ये संबंध आहे. त्यात तुम्हाला अटक होवू शकते. याबाबतची पत्र त्यांना वॉट्सअपवर पाठवण्यात आली. त्यात ईडी, सीबीआय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या पत्रांचा समावेश आहे. त्यामुळे तुमची सर्व संपत्ती जप्त केली जाईल असं त्यांना सांगितलं गेलं. त्यातून ती महिला प्रचंड घाबरली होती. अशा स्थितीत सायबर भामट्यांनी तिच्या सर्व बँक खात्यांची माहिती मिळवली. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Vaishnavi Hagawane: 'लेकीच्या मृत्यूनंतर ही तिच्यावर शिंतोडे का?', वैष्णवीचे वडील ढसाढसा रडले

बँक खात्यांची माहिती मिळवल्यानंतर या महिलेला 1 कोटी 81 लाख रूपये त्यांनी वेगवेगळ्या खात्यात ट्रान्स्फर करण्यास सांगितले. हे सर्व एक महिनाभर सुरू होते. शेवटी या महिलेला शंका आली. तिने नवी मुंबईच्या सायबर सेलशी संपर्क साधला. पोलिसांनी प्रकरणाचे गांभिर्य लक्षात घेवून तातडीने तपास सुरू केला. तांत्रिक तपास करत नवी मुंबई पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली. त्यात रमेश शेट, अमिष शहा आणि राजकुमार नारंग या सायबर भामट्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. तसेच आरोपींकडून 11 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत.

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Vaishnavi Hagawane:'वैष्णवीची आधी दोन लग्न तुटली',काय होतं कारण? वडीलांनी काय सांगितलं?

हे आरोपी बनावट इंटरनॅशनल कॉल सेंटर चालवत होते. देशभरात त्यांच्याविरुद्ध 73 ऑनलाईन फसवणुकीचे गुन्हे नोंदवले गेले आहेत. त्यांच्याकडून लॅपटॉप, 18 मोबाईल फोन, वेगवेगळ्या बँकांचे चेकबुक, पासबुक, रबरी शिक्के ही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गुन्हा करण्यासाठी हे गुन्हेगार दुकान भाड्याने घेत होते. नंतर ते एका बोगस कंपनीची स्थापना करायचे. त्यासाठी ही बोगस कागदपत्रांचा वापर त्यांच्याकडून केला जात होता. कंपनी स्थापन झाल्यानंतर त्या आधारावर ते बँकेत अकाऊंट उघडत असत. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Kolhapur News: चोरीचा बदला चोरी! तरुणाची भन्नाट शक्कल, पण शेवटी असं काही घडलं की...

कंपनीच्या नावाने करंट अकाऊंट त्यांनी ओपन केली होती. त्याच बरोबर इंटरनेट बँकींग ते घेत होते. शिवाय त्याचे लिमिट ही ते वाढवून घेत होते. डेबिट कार्ड त्यासाठी लागणारे सिम कार्ड दुबई आणि इतर देशात पाठवले जात. तिथे ही कॉल सेंटर बनले गेले होते. हे सर्व झाल्यानंतर ते आपली शिकार शोधतात. त्यानंतर त्यांच्यावर ईडी सीबीआयच्या नावाने जाळं टाकतात. भिती घालून मग पैसे लुटतात. अशी या गुन्हेगारांची पद्धत होती असं सहाय्यक पोलीस आयुक्त अजयकुमार लांडगे यांनी सांगितलं. शिवाय यांची बँक खाती फक्त महाराष्ट्र नाही तर पश्चिम बंगाल, झारखंड, मिझोरम, जम्मू काश्मीर इथं ही होती हे आता तपासात समोर आलं आहे.