Raja Raghuvanshi Case: 25 दिवसात 240 कॉल करणारा संजय वर्मा कोण? शातिर सोनमचा कट उघडकीस

Raja Raghuvanshi Sonam Raghuvanshi Case: संजय वर्माबाबतची आता मोठी माहिती समोर आली असून संजय वर्मा हा दुसरा कोणी नसून राज कुशवाह होता. तो आपली ओळख लपवून सोनमच्या सतत संपर्कात होता.

जाहिरात
Read Time: 2 mins

Raja Raghuvanshi Murder Case Update: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात दिवसेंदिवस अनेक मोठे खुलासे होत आहेत. शिलाँग पोलिस सोनम आणि या प्रकरणात अटक केलेल्या इतर आरोपींची चौकशी करत आहेत. या सर्वांमध्ये, या हत्या प्रकरणात संजय वर्मा नावाच्या एका नवीन व्यक्तीची एन्ट्री झाल्याने सर्वांनाच धक्का बसला होता. संजय वर्मा नावाच्या व्यक्तीने अवघ्या 25 दिवसांत सोनमला 240 फोन केले होते.  हा संजय वर्मा कोण? याबाबत आता मोठा खुलासा झाला आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

गेल्या महिन्यात मेघालयाच्या पूर्व खासी हिल्स जिल्ह्यातील सोहरा येथे इंदूर येथील व्यापारी राजा रघुवंशी यांच्या हत्येप्रकरणी त्याची पत्नी सोनमसह पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात नवे नाव आल्याने खळबळ उडाली होती. संजय वर्मा नावाच्या व्यक्तीशी सोनम बोलत असल्याचे उघड झाले होते. या संजय वर्माबाबतची आता मोठी माहिती समोर आली असून संजय वर्मा हा दुसरा कोणी नसून राज कुशवाह होता. तो आपली ओळख लपवून सोनमच्या सतत संपर्कात होता.

Advertisement

पूर्व खासी हिल्स जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक विवेक सिम म्हणाले की, आम्हाला कळले आहे की सोनमने राजाशी लग्न करण्यापूर्वी संजय वर्मा नावाच्या व्यक्तीला 100 हून अधिक फोन कॉल केले होते. लग्नानंतरही हे कॉल सुरूच होते., पोलिसांनी वर्माचा शोध घेण्यासाठी इंदूरमध्ये शोध मोहीम सुरू केली, त्याचा फोन बंद होता.  तपासात असे आढळून आले की वर्मा हा दुसरा कोणी नसून कुशवाहा होता, ज्याने त्याच्या प्रेयसीच्या पतीला मारण्याचा कट रचला होता.

Advertisement

( नक्की वाचा : Sonam Raghuvanshi : सर्वांसमोर भैय्या, पाठीमागे सैया! सोनम आणि राजचं अफेयर कसं सुरु झालं? )

आमची टीम इंदूरमध्ये आहे आणि काही लोकांची चौकशी करत आहे जेणेकरून राजाच्या मृत्यूचा फायदा कोणाला झाला असेल का हे शोधता येईल. 23 मे रोजी राजा रघुवंशी यांच्या हत्येमागे प्रेमप्रकरणाव्यतिरिक्त इतर काही आर्थिक कारण आहे का हे शोधण्यासाठी विशेष तपास पथकाचे एक पथक मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये आहे, असंही ते म्हणाले.  धक्कादायक बाब म्हणजे तीन अयशस्वी प्रयत्नांनंतर मारेकऱ्यांना राजा रघुवंशी यांना मारण्यात यश आल्याचे पोलिस अधीक्षकांनी सांगितले. त्यांनी सांगितले की, यापूर्वी गुवाहाटी, नोंगरियाट आणि वेसाडोंग फॉल्सजवळ राजाच्या हत्येचे प्रयत्न करण्यात आले होते.

Advertisement

Raja Raghuvanshi : 25 दिवसांमध्ये 119 कॉल... 'बेवफा' सोनम केसला नवं वळण, कोण आहे संजय वर्मा?