
Raja Raghuvanshi Murder : इंदूरमधील ट्रान्सपोर्ट व्यावसायिक राजा रघुवंशीच्या हत्या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. आपला मुलगा गमावल्याने दुःखात बुडालेल्या राजाच्या वडिलांनी सोनमवर आरोप केला आहे की तिने आपल्या कुंडलीतील 'मंगल दोष' दूर करण्यासाठी पतीची हत्या करवून घेतली. सोनम रघुवंशीनं प्रियकर राज कुशवाहशी लग्न करता यावं म्हणून ही हत्या केली असा दावा त्यांनी केला. आपल्या मुलाच्या मारेकऱ्यांना फाशी द्यावी, अशी मागणी राजाच्या वडिलांनी केली आहे.
मेघालय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हनिमूनसाठी गेलेला राजा रघुवंशी ( वय 29) याच्या कट रचून केलेल्या हत्येमध्ये त्याची पत्नी सोनम (वय 25) कथितरित्या सहभागी होती. तिने तिचा कथित प्रियकर राज कुशवाह (वय 20) याच्या मदतीने तिथे तीन भाडोत्री मारेकरी बोलावले होते.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
'माझा मुलगा जसा तडफडून मेला...'
राजा रघुवंशीच्या मृत्यूचा मोठा धक्का त्याचे वडील अशोक रघुवंशी यांना बसला आहे. ते म्हणाले की, 'माझा मुलगा तडफडून मेला आहे. त्याच्या हत्येतील सर्व दोषींना फाशीची शिक्षा मिळायलाच हवी, जेणेकरून एक उदाहरण बनेल आणि भविष्यात कोणत्याही आई-वडिलांना आपला मुलगा अशाप्रकारे गमवावा लागणार नाही.'
हनिमूनसाठी मेघालयला गेलेला त्यांचा मुलगा शवपेटीत घरी परतला, असे म्हणताना ते भावूक झाले. ते म्हणाले, 'घृणास्पद पद्धतीने केलेल्या हत्येमुळे माझ्या मुलाचे पार्थिव शरीर विद्रूप झाले होते. मी हृदयरोगी असल्याने माझ्या आरोग्याची चिंता करत माझ्या कुटुंबातील सदस्यांनी शवपेटी उघडून मला माझ्या मुलाचे अंतिम दर्शन घेण्यापासून रोखले.'
( नक्की वाचा : Raja Raghuvanshi Murder : राजाच्या हत्येनंतर सोनमनं 17 दिवस काय केलं? वाचा Inside Story )
जोडीदाराच्या मृत्यूने 'मंगल दोष' मिटतो?
रघुवंशींनी हा दावाही केला की राजाची पत्नी सोनमने तिच्या कुंडलीतील 'मंगल दोष' दूर करण्यासाठी पतीची हत्या करवून घेतली, जेणेकरून नंतर ती तिचा कथित प्रियकर राज कुशवाहशी दुसरे लग्न करू शकेल. मात्र, स्थानिक ज्योतिषी धीरज दीक्षित यांनी ही गोष्ट निराधार असल्याचे म्हटले आणि सांगितले की एखाद्या व्यक्तीच्या जोडीदाराच्या मृत्यूने त्याचा 'मंगल दोष' मिटत नाही.
( नक्की वाचा : Raja Raghuvanshi Murder : सोनमनं थकल्याचं नाटक केलं, हळू चालत होती, आणि एकदम ओरडली, 'त्याला मारा' )
सुरुवातीला राजा रघुवंशीच्या कुटुंबाने त्यांच्या हत्येच्या प्रकरणाच्या चौकशीत हलगर्जीपणाचा आरोप करत मेघालय सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते, पण, हत्याकांड उघडकीस आल्यानंतर या कुटुंबाचा सूर बदलला आहे. राजा रघुवंशीचा मोठा भाऊ विपिन रघुवंशीने सांगितले की ते मेघालय सरकारविरुद्धच्या वक्तव्याबद्दल माफी मागू इच्छितात.
ते म्हणाले, 'आम्हाला माहित नव्हते की मेघालय पोलीस राजाच्या मारेकऱ्यांना पकडण्यासाठी गुप्त मोहीम राबवत आहे. आमचा मेघालय सरकारला बदनाम करण्याचा कोणताही हेतू नव्हता. कठीण काळात सोबत दिल्याबद्दल आम्ही मध्य प्रदेश सरकारचे देखील आभारी आहोत.'
राजा रघुवंशीचे वडील अशोक रघुवंशी यांनी सांगितलं
VIDEO | Indore: Raja Raghuvanshi's father Ashok Raghuvanshi says, “They got married on May 11. Sonam came here for four days and went back to her home later. Children made a plan for a holiday. She left from her house and called my son at the airport… Her nature was very nice,… pic.twitter.com/nQpLuHmDLm
— Press Trust of India (@PTI_News) June 10, 2025
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world