Sangli News : 'तक्रार मागे घेण्यासाठी दीड कोटींचं आमिष'; बलात्कार पीडितेचे तत्कालिन गृहमंत्र्यांवर गंभीर आरोप

सांगली बलात्कार प्रकरण : पीडितेने तत्कालीन गृहमंत्री अन् महिला आयोग अध्यक्षांवर गंभीर आरोप केले आहेत. 

जाहिरात
Read Time: 2 mins

सांगलीत बलात्कार झालेल्या पीडितेला एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडून तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोपी बलात्कार पीडितेने केला आहे. या प्रकरणात तत्कालीन ग्रहमंत्री अनिल देशमुख आणि विद्यमान महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि सहभागी पोलीस अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी संबंधित पीडित महिलेने सांगलीत पत्रकार परिषदेत केली. याबाबत भुमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांच्या माध्यमातून पीडिता मुख्यमंत्री तथा ग्रहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं जाऊन रितसर तक्रार देणार आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पीडितेवर 2021 मध्ये कडेगाव पोलीस निरीक्षक बिपीन हसबनीस याने अत्याचार केला होता. याबाबत गुन्हाही दाखल आहे. मात्र ही तक्रार मागे घेण्यासाठी तत्कालीन ग्रहमंत्री अनिल देशमुख आणि विद्यमान महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सह्याद्री अतिथीग्रह येथे दीड कोटींची ऑफर दिल्याचा आरोपी पीडितेने पत्रकार परिषदेत केला आहे.

Advertisement

Advertisement

नक्की वाचा - Vaishnavi Hagawane: 'निलेश चव्हाणला डिक्कीत ठेवलंय'; त्या कॉलनंतर पुणे पोलिसांची धावपळ; अटक करायला गेले अन्...

यानंतर पीडितेला तत्कालीन ग्रहमंत्री अनिल देशमुख आणि विद्यमान महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या सांगण्यावरून त्यावेळी बलात्कार करणारे पोलीस निरीक्षक हसबनीस आणि तत्कालीन अप्पर अधीक्षक मनीषा डुबुले आणि डीवायएसपी कृष्णात पिंगळे यांनी सांगलीतील हॉटेल सीजन फोर येथे नजर कैदेत ठेवण्यात आले होते, असा आरोप पीडितेने केला आहे. 

या प्रकरणात आजही मला त्रास दिला जात आहे. माझे रेकॉर्ड चेक केले जात आहेत. पाठलाग सुरू असल्याचे पीडितेचे म्हणणे आहे. तर महिला आयोग अध्यक्षा चाकणकर यांनी राज्यात दररोज बलात्कार होतात मी कुठे कुठे लक्ष देऊ असे उत्तर पीडितेला दिले तर अजित पवार यांनी रुपाली ताई यांच्याकडे कामाचा बोजा जास्त आहे, त्यांना त्रास देऊ नका असे सांगितल्याचे पीडितेचे म्हणणे आहे. आतापर्यंत या पीडित महिलेने आयोगाकडे 530 इतके अर्ज केले आहेत, मात्र तरीही तिला न्याय मिळत नसल्याने आता न्यायासाठी ही पीडिता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दरवाजा ठोठावणार आहे. 

संबंधित पीडितेला न्याय देण्यासाठी भुमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई या पुढाकार घेणार आहेत. पीडितेला दबाव टाकून आमिष दाखवून प्रकरण मागे घेण्यासाठी दबाव टाकणारे तत्कालीन ग्रहमंत्री अनिल देशमुख आणि विद्यमान महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल व्हावा आणि महिलांना न्याय देण्यास असमर्थ ठरलेल्या आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना हटवण्यासाठी तृप्ती देसाई मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत.

Advertisement