योगेश शिरसाट, प्रतिनिधी
अकोल्याच्या पातूर तालुक्यात चान्नी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये दिग्रस बु. येथे बुधवार रोजी दुपारी जागेच्या वाद दोन गटात सुरू असलेला वाद सोडविण्यासाठी गेलेल्या महिलेवर सहा जणांनी हल्ला केल्याने वनिता गवई यांचा मृत्यू झाला आहे. यासंदर्भात अभिमन्यू अर्जुन गवई यांच्यासह ग्रामस्थांनी शनिवारी रोजी चान्नी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
या दरम्यान, दिग्रस बू.मध्ये दोन गटामध्ये मध्यस्थी करणाऱ्या गेलेल्या महिलेवर जबर हल्ला करण्यात आला. तर जखमी पती-पत्नी चान्नी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जात असताना दरम्यान जखमी महिलेची प्रकृती बिघडल्याने तिला उपचारासाठी अकोल्यातील रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र वनिताचा उपचार दरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे हल्ला करणाऱ्या सहा व्यक्तीविरुद्ध कारवाई करावी अशी मागणी मृतक वनिताच्या पतीसह ग्रामस्थांनी चान्नी पोलीस स्टेशनमध्ये केली आहे.
नक्की वाचा - Akole News : स्वातंत्र्याला 78 वर्षे उलटली तरीही गावात रस्ता नाही, आदिवासी महिलेची प्रसूती जंगलात उघड्यावर
दरम्यान न्याय न मिळाल्यास पती अभिमन्यू गवई याने मुलांसह आत्महत्या करण्याचा इशाराही दिला आहे.
वनिताचा झाला शेवट...
दिग्रस बू.मध्ये शुल्लक कारणावरून दोन गटात वाद सुरू होता. हा वाद मिटवण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या गेलेल्या महिलेवर जबर हल्ला करण्यात आला. दरम्यान यावेळी जखमी पती-पत्नी चान्नी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जात असताना वाद विकोपाला गेला दुसऱ्या गटाने गवई कुटुंबीयांना पळून पळून मारण्याचा प्रयत्न केला. वनिता पळत पळत एका ठिकाणी जमिनीवर कोसळली.. जागेचा वाद सोडवून वनिता करणार होती भांडण शांत.. मात्र वनिताचा झाला शेवटचा यामध्ये अंत.. अशी स्थिती निर्माण झाली आणि जखमी वनिता'ची प्रकृती बिघडल्याने तिला उपचारासाठी अकोला मधे भरती केले. मात्र वनिता'चा उपचार दरम्यान मृत्यू झालाये. त्यामुळे हल्ला करणाऱ्या सहा व्यक्तीविरुद्ध कारवाई करावी अशी मागणी मृतक वनिता'च्या पतीसह ग्रामस्थांनी चान्नी पोलिस ठाण्यात मध्ये धाव घेऊन तक्रार केली आहे.
कारवाई करा, अन्यथा मुलांसह आत्महत्या अभिमन्यू'चा इशारा..!
आपल्या पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर आपल्या मुलाचा सांभाळ कोण करेल त्यामुळे पत्नीच्या मारेकऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा करावी आणि पत्नीवर सहा जणांनी हल्ला केल्यामुळेच तिचा उपचार दरम्यान मृत्यू झालाय.. असा आरोप पती अभिमन्यू कडून केलाय.. हल्ला करणाऱ्याविरुद्ध कारवाई करा अन्यथा तीन लहान मुलांसह आत्महत्या करण्याचा इशारा ही पती अभिमन्यू गवई यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीतून केला आहे. दरम्यान मृतक महिलेची उत्तरीय तपासणी करण्यात आली आहे.उत्तरीय तपासणी अहवाल प्राप्त झाल्यावर सखोल चौकशी करून पतीच्या फिर्यादीवरून आरोपी विरुद्ध कारवाई करू असं सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र लांडे यांनी म्हटलं. दरम्यान शुल्लक कारणावरून होत असलेल्या एकाच आठवड्यात दोन घटना घडल्यामुळे नवनियुक्त जिल्हा पोलीस अधीक्षकांना आता अकोला जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.