गोविंदाला या अभिनेत्रीने लावलं होतं याड, साखरपुडा मोडून थाटायचा होता संसार;मग काय झालं?

Bollywood Actor Govinda: अभिनेता गोविंदाने रवीना टंडन, राणी मुखर्जी, करिश्मा कपूरसोबत कित्येक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. पण 80च्या दशकामध्ये या सुंदर अभिनेत्रीसोबत गोविंदाची जोडी सुपरहिट ठरली होती. गोविंदाचा सुनीतासोबत साखरपुडा झालेला असतानाही त्याला या अभिनेत्रीशी लग्न करायचे होते.

जाहिरात
Read Time: 2 mins

Bollywood Actor Govinda: बॉलिवूडमधील 'हीरो नंबर 1' गोविंदाला काही दिवसांपूर्वीच मोठी दुखापत झाली. घरामध्ये असताना त्याच्याकडूनच पिस्तुलातून चुकून गोळी सुटली आणि ती थेट त्याच्या पायामध्ये घुसली. यानंतर गोविंदाला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. शस्त्रक्रिया आणि औषधोपचार केल्यानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला. सध्या गोविंदा आराम करत आहे. पण यानिमित्ताने गोविंदा आणि त्याच्या जीवनाशी संबंधित कित्येक गोष्टी चर्चेत येत आहेत. 80-90च्या दशकामध्ये गोविंदाचे स्टारडम बॉलिवूडमधील तीनही खानवर भारी पडत होते. गोविंदाने सिनेसृष्टीला कित्येक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. गोविंदाने रवीना टंडन, राणी मुखर्जी आणि करिश्मा कपूरसोबतही केलेले कित्येक सिनेमे ब्लॉकबस्टर ठरले आहेत. दरम्यान 80च्या दशकामध्ये एका सुंदर अभिनेत्रीसोबत गोविंदाची जोडी सुपरडुपर हिट ठरली. इतकेच नव्हे तर गोविंदाचा जीव या हिरोईनमध्ये गुंतला होता. यावेळेस गोविंदाचा सुनीता यांच्यासोबत साखरपुडा देखील झाला होता. पण तरीही त्याला या सुंदर अभिनेत्रीसोबत लग्न करण्याची इच्छा होती.  

(नक्की वाचा: सूरज चव्हाणने सांगितले कोकण हार्टेड गर्लचा होणारा नवरा कसा दिसतो, ऐका काय म्हणाला VIDEO)

कोण होती ती हिरोईन?

गोविंदाने वर्ष 1990मध्ये एका मासिकाला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्याने उघडपणे त्याच्या मनातील प्रेमाच्या भावनाही व्यक्त केल्या होत्या. ही अभिनेत्री दुसरीतिसरी कोणी नसून नीलम कोठारी होती. गोविंदा नीलम कोठारीच्या प्रेमात पडला होता आणि तिच्यासोबत लग्न करण्यासाठी त्याने सुनीतासोबतचा साखरपुडा देखील मोडला होता. गोविंदाने असेही सांगितले होते की, "मी आणि नीलमने सलग सुपरहिट सिनेमे दिले. यादरम्यान आमच्यामध्ये जवळीकता निर्माण होऊ लागली. मग मी क्षुल्लक कारणावरून सुनीतासोबत झालेला साखरपुडा मोडला होता. सुनीताने जर मला पाच दिवसांच्या आत फोन केला नसता तर माझे नीलमसोबत लग्न झाले असते".

(नक्की वाचा: Bigg Boss Marathi : सूरज चव्हाण जिंकला, पण अभिजीत सावंत झाला मालामाल, कोणी किती पैसे कमावले?)

गोविंदाने स्वतःचे लग्न लपवले होते?

गोविंदाने सुनीतासोबत लग्न केले होते, पण त्यांनी स्वतःचे लग्न कित्येक वर्षे संपूर्ण जगापासून लपवले होते. गोविंदाने नीलमला देखील त्याच्या लग्नाची माहिती कळू दिली नव्हती. गोविंदाच्या म्हणण्यानुसार, तो आणि नीलमच्या कुटुंबीयांची पार्श्वभूमी वेगळी होती, याची नीलमलाही माहिती होती. नीलमला देखील हँडसम आणि चांगल्या घराण्यातील मुलाशी लग्न करायचे होते. गोविंदाने असेही म्हटले होते की, नीलमसोबत लग्न झालं असतं तरीही ते दोघं कुटुंबीयांमुळे विभक्त झाले असते. दरम्यान नीलम कोठारीनं अभिनेता समीर सोनीशी लग्न केले.  

(नक्की वाचा: Govinda Audio Clip : गोळीबारानंतर गोविंदाची ऑडिओ क्लीप समोर, काय म्हणाला?)