Annu Kapoor News: बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्यांमध्ये ओम पुरी यांचे नाव आदराने घेतले जाते. पण अभिनेते अन्नू कपूर यांच्या मनात त्यांच्याबद्दल आजही कटू आठवणी आहेत. ज्यांना माहिती नाही त्यांना सांगू इच्छितो की, अन्नू कपूर यांची बहीण सीमा कपूर यांचा विवाह ओम पुरी यांच्याशी झाला होता. पण सीमा कपूर प्रेग्नेंट असतानाच ओम पुरी यांनी त्यांना सोडून नंदिताशी लग्न केले. नुकतेच सिद्धार्थ कननच्या शोमध्ये संवाद साधताना अन्नू कपूर यांनी त्यांच्या बहिणीच्या आयुष्यातील तो कठीण काळ सर्वांसमोर मांडला आणि ओम पुरींच्या खासगी आयुष्यावरही भाष्य केले.
ओम पुरी एक उत्कृष्ट अभिनेते
अन्नू कपूर म्हणाले, "ओम पुरी हे एक उत्कृष्ट अभिनेते होते. त्यांच्यासारखा दुसरा अभिनेता होणे कठीण आहे. पण हा भाग वेगळा. ते दुसऱ्या महिलेचे पती झाले आणि पती बनल्यानंतर त्यांनी एका महिलेला फसवले. काही गोष्टी चुकीच्या घडल्या आणि मी त्या महिलेचा भाऊ आहे." अन्नू कपूर यांनी 90च्या दशकादरम्यान घडलेल्या प्रसंगावर भाष्य केले, ज्यावेळेस ओम पुरी आणि सीमा कपूर यांचा विवाह काही महिन्यांतच संपुष्टात आला होता, कारण त्यांना ओम पुरींच्या अफेअरबाबत माहिती समजली.
(नक्की वाचा: Bollywood History: 1 बंगला, 3 सुपरस्टार, 3 जणांना ही केलं उद्ध्वस्त, 'शापित' बंगल्याची रहस्यमय कहाणी)
अन्नू कपूर म्हणाले- ते 10 वर्षांपूर्वीच गेले असते
अनेक वर्षांनंतर ओम पुरींची प्रकृती बिघडल्यानंतर ते दोघे पुन्हा एकत्र आले होते. यावर प्रतिक्रिया देताना अन्नू कपूर म्हणाले की, ते केवळ ओम पुरींवरच नव्हे, तर त्यांच्या स्वतःच्या बहिणीवरही रागावलेले होते. ते म्हणाले, "ते 10 वर्षांपूर्वीच गेले असते. माझी बहीणच होती जिने त्यांची काळजी घेतली. जेव्हा त्यांचे शरीर कमकुवत झाले, तेव्हाच ते परत आले. मी माझ्या बहिणीवरही नाराज झालो होतो."
(नक्की वाचा: Raja Shivaji: रितेशच्या चित्रपटात महाराजांची युद्धनीती चुकीची दाखवली? 'वाघनखांच्या' प्रसंगाचा इतिहास काय आहे?)
ओम पुरींवर अन्नू कपूर यांचा होता रागअन्नू कपूर पुढे म्हणाले, "आज ओम पुरी आपल्यात नाहीत. त्यांना एक मुलगा आहे. आजही मी त्यांच्या मुलासाठी आणि त्यांची दुसरी पत्नी नंदिता हिच्यासाठी देवाला प्रार्थना करतो. माझी कोणाशीही शत्रुत्व नाही. पण बहिणीबद्दल वाईट वाटते, कारण तिचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. तिच्याकडे कोणताही आधार नव्हता. जर मी सर्व गोष्टी सांगायला लागलो तर परिस्थिती बिघडेल, कारण माझ्यातील भाऊ बाहेर येईल. ओम पुरी माझ्याशी घाबरून असायचे, कारण मी स्पष्ट बोलायचो. मी कशालाही घाबरत नव्हतो. मी हतबल होतो, मी काहीच करू शकलो नाही."