Aamir Khan: 'महाभारत' हा आमिर खानचा शेवटचा चित्रपट असेल! तो म्हणाला...

आमिरने 'द हॉलीवूड रिपोर्टर'ला या चित्रपटाच्या बद्दलही सांगितले होते.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान त्यांच्या आगामी "सितारे जमीन पर" या चित्रपटासाठी तयारी करत आहेत. याशिवाय, तो त्यांचा ड्रिम प्रोडेक्ट "महाभारत" या चित्रपटावरही काम करत आहेत. याच दरम्यान, त्यांने संकेत दिले आहेत की हा मोठा चित्रपट त्यांचा शेवटचा चित्रपट असू शकतो. त्यामुळे या चित्रपटानंतर अमिर खान रुपेरी पडद्यावर दिणार की नाही  याची चर्चा सुरू झाली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

राज शमानी यांना दिलेल्या मुलाखतीत अमिर खानने सांगितले की त्यांना त्यांचा शेवटचा चित्रपट कसा हवा आहे. "महाभारत" बद्दल बोलताना ते म्हणाले की त्यांना हा चित्रपट बनवायचा होता. ते म्हणाले, "हा चित्रपट भावनात्मक आहे. यात अनेक गोष्टी एकमेकां बरोबर जोडल्या गेल्या आहेत. याचा आवाका मोठा आहे, जगात तुम्हाला जे काही मिळेल, ते तुम्हाला महाभारतात मिळेल." असं ही त्याने या चित्रपटा बद्दल सांगितलं. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Rain Update : ईशान्येकडील राज्यांमध्ये हाहाकार; कुठे भूस्खलन तर कुठे महामार्ग गेला वाहून, 2 दिवसात 30 जणांचा मृत्यू

Advertisement

आमिर खान यांनी संकेत दिले की "महाभारत" हा त्यांचा शेवटचा चित्रपट असू शकतो. तो म्हणाला, "कदाचित हे केल्यानंतर मला वाटेल की माझ्याकडे करण्यासाठी काहीच उरले नाही. यानंतर मी काहीही करू शकत नाही, कारण या चित्रपटाची सामग्री तशीच असणार आहे. मला आशा आहे की मी माझे बूट घातलेले असतानाच मरेन, परंतु तुम्ही विचारत असल्यामुळे, ही अशी एक गोष्ट आहे ज्याबद्दल मी विचार करू शकतो. कदाचित यानंतर मला असे वाटेल की मला आणखी काही करण्याची गरज नाही."

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Beed News : परळी वैद्यनाथाच्या मंदिर परिसरात मटण, ऑम्लेट शिजवल्याचा प्रकार; भाविकांचा संताप

आमिरने 'द हॉलीवूड रिपोर्टर'ला या चित्रपटाच्या बद्दलही सांगितले होते. तो म्हणाला, "ही माझ्या सर्वात मोठ्या महत्त्वाकांक्षांपैकी एक आहे ,आणि कथा लिहिण्यासाठीच अनेक वर्षे लागतील." यात अभिनय करणार का असे विचारले असता तो म्हणाला, "कोणत्या भूमिकेसाठी कोण योग्य आहे हे आम्ही पाहू." त्यामुळे त्याबाबतही सस्पेन्स कायम आहे. या मोठ्या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार का असे विचारले असता, आमिरने सांगितले की 'महाभारत' ही अशी कथा आहे जी एकाच वेळी सांगितली जाऊ शकत नाही. शिवाय तो स्वता दिग्दर्शक असेल की नाही हे त्यांने सांगितले नाही. त्यांने सांगितले की ही कथा अनेक चित्रपटांमध्ये बनवली जाईल. त्यामुळे, एका निश्चित वेळेत ते पूर्ण करण्यासाठी, त्यांना एकापेक्षा जास्त दिग्दर्शकांची गरज असेल. त्यामुळे या चित्रपटाबाबत उत्सुकता वाढली आहे. 

Topics mentioned in this article