अमिताभ बच्चननं 'या' कारणासाठी केलं जयाशी लग्न... अन्यथा नसते आज पती-पत्नी

जाहिरात
Read Time: 2 mins
Amitabh Bachchan Jaya Bachchan : या कारणामुळे केलं अमिताभ यांनी लग्न
मुंबई:

Amitabh Bachchan Jaya Bachchan Love Story :  अमिताभ बच्चन आणि जया बच्चन ही जोडी बॉलिवूडमधील सर्वात प्रतिष्ठित जोडप्यांपैकी एक आहे. ही जोडी 5 दशकांहून अधिक काळ एकत्र आहे. या दोघांनी गेल्या पाच वर्षात आयुष्यातील सर्व चढ-उतार एकमेकांच्या सोबतीनं पूर्ण केले आहेत. कौन बनेगा करोडपती'च्या एका एपिसोडमध्ये अमिताभ बच्चन यांनी जयाशी लग्न करण्यामागचे मुख्य कारण सांगितले. अमिताभ एक किस्सा सांगताना म्हणाले की ते जयाच्या केसांनी खूप प्रभावित झाले होते. जयाचे काळे, लांब आणि सुंदर केस त्यांच्यावर जादू केली, असं त्यांनी सांगितलं. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

अशी झाली भेट

अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांची पहिली भेट 1971 मध्ये ऋषिकेश मुखर्जी यांच्या 'गुड्डी' चित्रपटाच्या सेटवर झाली होती. त्यावेळी जया एक प्रस्थापित अभिनेत्री होत्या, तर अमिताभ इंडस्ट्रीमध्ये आपले स्थान निर्माण करत होते. सिनेमाबद्दलच्या त्यांच्या समान आवडीने त्यांच्यात लवकरच घट्ट मैत्री झाली.  

Advertisement

1973 मध्ये 'जंजीर'च्या यशानंतर, अमिताभ बच्चन यांनी जया बच्चनसोबत लंडनला जाण्याचा प्लॅन केला होता. पण, त्यांच्या पालकांनी दोघांनी लग्न करुनच लंडनला जावे असा आग्रह केला. त्यांनतर 3 जून 1973 रोजी एका खासगी समारंभात लग्न केले. त्याच संध्याकाळी ते दोघं लंडनला रवाना झाले. 

Advertisement

1970 च्या दशकात आणि त्यानंतर, अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांनी 'अभिमान', 'चुपके चुपके', 'शोले' आणि 'सिलसिला' यांसारख्या अनेक उत्कृष्ट आणि सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले. त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांनाही चांगलीच आवडली होती.  

Advertisement

( नक्की वाचा :  'कुछ कुछ होता है'मधील अंजलीचा फोटो व्हायरल, 27 वर्षानंतरचा लुक पाहून बसणार नाही विश्वास )

लग्नाला 52 वर्षे पूर्ण

आज (3 जून) त्यांच्या लग्नाला 52 वर्षे पूर्ण झाली असताना, अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांनी नेहमीच प्रेम आणि परस्पर आदराचे उदाहरण घालून दिले आहे. प्रेम आणि अतूट विश्वासाच्या जोरावर त्यांनी ही वाटचाल केली आहे. 
 

Topics mentioned in this article