Ayodhya Ram Mandir: अयोध्येच्या राम मंदिर उभारणीत तब्बल 'इतके' किलोंचे सोने; किंमत किती? पहिल्यांदाच आकडा समोर

Ayodhya Ram Mandir Gold: रामललाचे सिंहासन देखील सोन्याने सजवण्यात आले आहे. तथापि, शेषावतार मंदिराच्या शिखरावर सोन्याचे काम अद्याप बाकी आहे, ज्याचे बांधकाम वेगाने सुरू आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

अयोध्येतील भव्य राम मंदिराचे काम आता पूर्णत्वाकडे वाटचाल करत आहे. रामभक्तांसाठी हे मंदिर केवळ भक्तीचे केंद्रच नाही तर आध्यात्मिक आणि सांस्कृतिक अभिमानाचे प्रतीक बनले आहे. या भव्यदिव्य मंदिराच्या बांधणीला हजारो कोटींचा खर्च करण्यात आला असून अनेक भाविक भक्तांनी त्यासाठी देणग्या दिल्या आहेत. अशातच आता पहिल्यांदाच राम मंदिरासाठी किती सोने वापरले? याबाबतची माहिती समोर आली आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

अयोध्येतील श्रीराम  मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी या मंदिरातील सोन्याबाबत महत्त्वाचा खुलासा केला आहे. राम मंदिरात आतापर्यंत 45 किलो शुद्ध सोने वापरले गेले आहे, ज्याची किंमत कर वगळता सुमारे 50 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. रामलल्ला विराजमान आहेत त्या राम मंदिराच्या तळमजल्यावरील प्रत्येक दरवाजा सोन्याने मढवण्यात आला आहे. यासोबतच रामललाचे सिंहासन देखील सोन्याने सजवण्यात आले आहे. तथापि, शेषावतार मंदिराच्या शिखरावर सोन्याचे काम अद्याप बाकी आहे, ज्याचे बांधकाम वेगाने सुरू आहे.

Advertisement

नृपेंद्र मिश्रा यांच्या मते दर्शनाची व्यवस्था अजूनही तयार केली जात आहे कारण मोठ्या संख्येने भाविक एकत्र येऊ शकत नाहीत. अशा प्रकारची खबरदारी घेतली जात आहे. दर्शन पासची व्यवस्था केली जात आहे, जी मोफत असेल आणि दर्शन फक्त पासद्वारेच शक्य होईल. मुख्य राम मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले असले तरी, संकुलात संग्रहालय, सभागृह आणि अतिथीगृह असे अतिरिक्त बांधकाम अजूनही सुरू आहे, जे डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.आता फक्त राम कथा मंडपात दगड ठेवण्याचे काम बाकी आहे, असेही नृपेंद्र मिश्रा म्हणाले.

Advertisement

नक्की वाचा - UP News: रीलने केला घात! एकाच घरातील 6 मुली बुडाल्या, चौघींचा मृत्यू, गावावर शोककळा

दरम्यान, राम मंदिर ट्रस्टचे सचिव चंपत राय यांनी सांगितले की, गुरुवारी मंदिर परिसरात एकूण सात मूर्तींचेी प्राणप्रतिष्ठा करण्यात आले. पहिल्या मजल्यावरील गर्भगृहाच्या वर मध्यभागी राम दरबाराची स्थापना करण्यात आली आहे, तर ईशान्य दिशेला शिवलिंग, आग्नेय दिशेला गणपती, दक्षिण दिशेच्या मध्यभागी हनुमान जी, नैऋत्य दिशेला सूर्यदेव, वायव्य दिशेला भगवती आणि उत्तर दिशेच्या मध्यभागी अन्नपूर्णा मातेच्या मूर्तींची स्थापना करण्यात आली आहे.

Advertisement

Covid 19 : राज्यातील निम्म्याहून अधिक रुग्ण एकट्या मुंबईत; कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ