जाहिरात

UP News: रीलने केला घात! एकाच घरातील 6 मुली बुडाल्या, चौघींचा मृत्यू, गावावर शोककळा

मुलींनी आरडाओरडा केला मात्र तोपर्यंत चार जणांचा मृत्यू झाला होता तर दोघींना गंभीर अवस्थेत बाहेर काढण्यात आले, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

UP News: रीलने केला घात! एकाच घरातील 6 मुली बुडाल्या, चौघींचा मृत्यू, गावावर शोककळा

उत्तरप्रदेश: उत्तर प्रदेशातील आग्रा येथे एक दुःखद घटना घडली आहे. यमुना नदीत आंघोळ करताना एकाच कुटुंबातील सहा मुली बुडाल्याचे समोर आले आहे. यांपैकी चार जणींचा मृत्यू झाला असून दोघींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यमुना नदीवर रिल्स बनवण्याच्या नादात ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

समोर आलेल्या माहितीनुसार, रिल्स बनवण्याच्या नादात सहा मुली यमुना नदीत बुडाल्याची दुर्दैवी घटना उत्तर प्रदेशातील आग्रा येथे घडली आहे. यापैंकी चार मुलींचा मृत्यू झाला असून दोघींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या सर्व मुली एकाच घरातील असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 

या सर्व मुली नदीवर आंघोळीसाठी गेल्या होत्या.  नदीत आंघोळ करण्यापूर्वी सर्व मुलींनी मोबाईल फोनने रील देखील बनवली होती. नदीकाठी उभे राहून ही रील बनवली जात होती. त्यानंतर सर्व मुली पाण्यात उतरल्या. यावेळीही रील बनवणे सुरु होते. याचवेळी नदीत उतरताच एका मुलीचा पाय खड्ड्यात गेला. त्यानंतर तिच्यासोबत असलेल्या सर्व मुली एकत्र बुडू लागल्या. मुलींनी आरडाओरडा केला मात्र तोपर्यंत चार जणांचा मृत्यू झाला होता तर दोघींना गंभीर अवस्थेत बाहेर काढण्यात आले, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

RCB Captains : 18 वर्षात दिग्गजांना जमलं नाही ते पाटीदारने करुन दाखवलं; RCB चे आतापर्यंतचे 8 कर्णधार

नागला नाथू येथील रहिवासी सुरेश चंद्र यांच्या तीन मुली, मुस्कान (वय, 18), दिव्या (15), संध्या उर्फ ​​कांचन (12), चुलत बहीण नैना (14) दिनेश यांची मुलगी आणि चुलत भाऊ राज कपूर यांचा मुलगा दीपेश (14) यांचा समावेश आहे. या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे.

दुर्दैवी बाब म्हणजे या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांपैकी मुस्कान या मुलीचे काही दिवसांनी लग्नही होणार होते. मुस्कानचे लग्न नुकतेच सिकंदरा येथील महल गावात निश्चित झाले होते. कुटुंब मुस्कानच्या लग्नाच्या तयारीत व्यस्त होते. कुटुंब १ नोव्हेंबर रोजी देवोत्थान येथे तिचे लग्न करायचे होते. मात्र त्याआधीच नियतीने घात केला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com