
अहमदाबादमध्ये झालेल्या विमान दुर्घटनेनंतर संपूर्ण देश स्तब्ध झाला आहे. एअर इंडियाच्या या विमानात 242 प्रवासी होते. या विमानाने लंडनच्या दिशेने उड्डाण घेतलं होतं. टेकऑफच्या पुढील काही सेकंदात अहमदाबादमधील एका मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहात विमान कोसळलं. या दुर्घटनेत केवळ एक व्यक्ती आश्चर्यकारकरित्या बचावला. त्याचं नाव विश्वास आहे.
विश्वास कसा बचावला, हा कोणता चमत्कार आहे?
विश्वास रमेश या दुर्घटनेतून बचावला आहे. तोदेखील याच विमानातून प्रवास करीत होता. या विमानातील 241 जण दगावले. मात्र तो वाचला. याबाबत आम्ही आग्र्यातील ज्योतिषी डॉ. अरविंद मिश्र यांच्यासोबत बातचीत केली. या दुर्घटनेत एक व्यक्ती बचावणं हा चमत्कार आहे का? या प्रत्युत्तरात ज्योतिषी अरविंद म्हणाले, प्रवास सुरू करण्यापूर्वी भगवान गणेशाचं नाव घेऊन सुरुवात करावी. आणि शुभ वस्तूचं सेवन करावे . आई-वडिलांचा आशीर्वाद घेऊन प्रवासाला सुरुवात करावी. प्रवासादरम्यान देवाच्या नावाचा जप करायला हवा. अहमदाबादमधील जी दुर्घटना घडली त्या दुर्घटनेचं मुख्य कारण ज्वालामुखी योग आहे. जो सकाळी 5.27 पासून दुपारी 2.27 पर्यंत होता. काही लोकांच्या जन्मकुंडलीत अकाल मृत्यू असतो. त्यांचा या दुर्घटनेत मृत्यू होतो. जी व्यक्ती बचावली त्यामागे निश्चितपणे कुंडलीमधील दीर्घायु योग असू शकतो आणि देवाच्या कृपेने त्यांचा जीव बचावला.
नक्की वाचा - Air India Plane Crash Song: अहमदाबाद विमान दुर्घटनेवर गाणं, 3 दिवसात साडेपाच लाख व्ह्युज
पुढे ज्योतिषी म्हणाले, प्रवासाचे दोन प्रकार असतात. एक म्हणजे जेव्हा तुम्ही तुमचे घर सोडता आणि संध्याकाळी घरी परतता तेव्हा त्याला आपण स्थानिक प्रवास म्हणू शकतो. दुसरा प्रवास म्हणजे लांब पल्ल्याचा प्रवास, जो आपण शुभ मुहूर्त पाहून केला पाहिजे.
याअंतर्गत, प्रवासाच्या दिशेची माहिती असायला हवी. प्रवास करणाऱ्या व्यक्तीच्या जन्म राशीनुसार, त्या दिवशी चंद्र 4, 6, 8, 12 नसावा. तसेच शुभ लग्न, शुभ चौघडिया मुहूर्त, शुभ नक्षत्र इत्यादी लक्षात ठेवा.
नक्की वाचा - Ahmedabad Plane Crash : जळतं हॉस्टेल आणि उडी मारणारे विद्यार्थी, अहमदाबाद विमान अपघाताचा पाहा भयंकर Video
कधी, कोणत्या दिशेने जाणं टाळावं..
- शनिवारी दिशासूल पूर्वेकडे असतो. जर प्रवास करणं आवश्यक असेल तर पांढरे तीळ खाऊन चौघडिया मुहूर्तावर प्रवासाची सुरुवात करा.
- शुक्रवारी पश्चिम दिशेला दिशाशूल असेल. जर प्रवास करणं आवश्यक असेल तर आलं खाऊन चौघडिया मुहूर्तावर प्रवासाची सुरुवात करा.
- बुधवारी उत्तर दिशेला दिशा शूल असतं. प्रवास करणं आवश्यक असेल तर प्रवास सुरू करण्यापूर्वी पाच पावलं विरोधी दिशेले चाला, यानंतर यात्रेला सुरुवात करा. या चौघडिया मुहूर्तात प्रवासाची सुरुवात कोथिंबिर किंवा पांढरे तिळ खाऊन करा.
- मंगळवारी दिशा शूल उत्तर दिशेला आहे. या दिवशी, चौघडिया मुहूर्तावर थोडा गूळ खा आणि प्रवास सुरू करा.
- सोमवारी, पूर्वेकडे प्रवास करण्यास मनाई आहे. या दिवशी आरशात पहा आणि चौघडिया मुहूर्तावर प्रवास सुरू करा.
- रविवारी, दिशा शूल पश्चिम दिशेला आहे. यावेळी प्रवास टाळा. या दिशेला पान खाऊन चौघडिया मुहूर्तावर प्रवासाला सुरुवात करा.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world