CBSE Result 2025: सीबीएसई निकालाबाबत मोठे अपडेट, रिचेकिंगचे नियम बदलले

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

CBSE Exam: सीबीएसईचे निकाल लवकरच जाहीर होणार आहेत. या निकालापूर्वी बोर्डानं काही नियमांमध्ये बदल केले आहे. निकालानंतर सर्व प्रक्रियेमध्ये पारदर्शकता राहावी यासाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डानं (CBSE) हा निर्णय घेतलाय. सीबीएसईच्या दहावी आणि बारावी परीक्षेतील निकालानंतर जे विद्यार्थी पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करतील त्यांना हा नियम लागू असेल.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय आहे नियम?

नव्या नियमानुसार विद्यार्थ्यांना सुरुवातीला मुल्यांकन करण्यात आलेल्या उत्तर पत्रिकेची प्रत दिली जाईल. विद्यार्थी ती प्रत पाहिल्यानंतक रिचेकींगसाठी अर्ज करु शकतील. यापूर्वी विद्यार्थ्यांनी रिचेकींगचा अर्ज केल्यानंतर त्यांना उत्तर पत्रिकेची प्रत देण्यात येत होती.

( नक्की वाचा : कशी असते UPSC परीक्षा? सरकारी अधिकारी होण्यासाठी काय करावं लागतं? )
 

सीबीएसईनं याबाबत प्रसिद्ध केलेल्या नोटिशीमध्ये म्हंटले आहे की, या बदलामुळे पडताळणीसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकांचे पुनरावलोकन करण्याची परवानगी देण्यात येणार आहे. त्याचा त्यांना फायदा होईल. नव्या नियमानंतर विद्यार्थ्यांना त्यांची मुल्यांकन  केलेली उत्तर पत्रिका पाहाता त्यामधील मार्क पाहून त्यांना पुढील निर्णय घेण्यास, तसंच यापूर्वी केलेल्या चुकांची माहिती समजण्यास सोपे होईल. 

( नक्की वाचा : Indian Army : सैन्यात डॉक्टर कसं व्हायचं? काय आहे पात्रता? वाचा संपूर्ण माहिती )

नव्या नियमानुसार विद्यार्थ्यांना आता त्यांचे मुल्यांकन केलेल्या उत्तर पत्रिकेची फोटोकॉपी मिळेल. त्यामध्ये ते प्रत्येक प्रश्न आणि त्यावरील उत्तराला मिळालेले मार्क्स पाहाता येतील. त्यामुळे त्यांना त्यांनी परिक्षेत केलेल्या कामगिरीची कल्पना येईल. ही फोटोकॉपी मिळाल्यानंतर फेरतपासणीसाठी अर्ज करायचा की नाही? याचा निर्णय ते घेऊ शकतात, असे सीबीएसई बोर्डानं स्पष्ट केले आहे. 

Advertisement
Topics mentioned in this article