भारतात कोविड-19 (COVID-19) च्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. ताज्या आकडेवारीनुसार, सध्या देशात कोरोनाचे सक्रिय रुग्ण 3000 च्या वर पोहोचले आहेत. केरळ हे देशातील असे राज्य आहे जिथे रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, 25 मे नंतर देशातील कोरोनाच्या आकडेवारीत 10 पट वाढ झाली आहे. केरळव्यतिरिक्त महाराष्ट्र, कर्नाटक आणि दिल्लीत या विषाणूने सर्वाधिक रुग्ण आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कोणत्या राज्यात किती रुग्ण?
गेल्या 9 दिवसांत देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये 1300 टक्के वाढ झाली आहे. तर, देशात गेल्या 48 तासांत 21 मृत्यू झाले आहेत. सध्या देशात 3783 सक्रिय रुग्ण आहेत. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, बेंगळूरुमध्ये लसीचे तिन्ही डोस घेतलेल्या रुग्णाचाही मृत्यू झाला आहे. त्यामुळे भीतीचे वातावरण आहे. लस घेवून मृत्यू झाल्याची ही पहिलीच घटना आहे. त्यामुळे सर्वांनीच काळजी घेण्याची गरज वर्तवली जात आहे.
केरळमध्ये सध्या कोरोनाचे सर्वाधिक सक्रिय रुग्ण असून, येथे आता 1400 रुग्ण आहेत. रविवारपर्यंत येथे 64 नवीन प्रकरणे नोंदवली गेली होती. यानंतर महाराष्ट्राचा नंबर लागतो. महाराष्ट्रात रविवारपर्यंत सक्रिय रुग्णांची संख्या 485 होती. त्यात 1 जून ला 18 नवीन प्रकरणे आली आहेत. तर, दिल्लीत रविवार कोविडचे सक्रिय रुग्ण 436 होते. ज्यात 1 जून रोजी 61 नवीन समोर आली आहेत.
कोणत्या राज्यात किती रुग्ण?
- गुजरात -320
- कर्नाटक- 238
- पश्चिम बंगाल -287
- तमिलनाडु -199
- उत्तर प्रदेश -149
- राजस्थान -69
- पुड्डुचेरी -45
- हरियाणा - 30
- आंध्र प्रदेश -23
- मध्य प्रदेश -19
- गोवा -10
- ओडिशा-9
- पंजाब -6
- छत्तीसगढ़ -6
- जम्मू कश्मीर -6
- झारखंड- 6
- आसम-5
- अरुणाचल प्रदेश -3
- सिक्किम- 3
- तेलंगाणा -3
- उत्तराखंड- 3
- बिहार- 2
- मिजोरम -2
- चंडीगढ़- 1
घाबरण्याची गरज नाही
आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत कोविडमुळे देशात चार मृत्यू झाले आहेत. दिल्ली, केरळ, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशमध्ये प्रत्येकी एका मृत्यूचा झा आहे. अधिकृत सूत्रांचे म्हणणे आहे की, भारतातील कोरोनाच्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. कोरोनाचा विषाणूचा प्रवाभ तेवढा गंभीर नाही. शिवाय बहुतेक रुग्ण घरीच उपचार घेत आहेत. त्यामुळे सर्वांना आवाहन करण्यात आले आहे की चिंता करण्याची गरज नाही. कुणीही घाबरन जावू नये. मात्र सर्वांना कळजी घेण्याची गरज असल्याचे सांगितले जात आहे.
पश्चिम आणि दक्षिणेकडील नमुन्यांच्या जीनोम सिक्वेन्सिंगमधून असे दिसून आले आहे की, सध्याच्या कोरोना वाढीस कारणीभूत असलेले व्हेरियंट गंभीर नाहीत. ते ओमिक्रॉनचे सबव्हेरियंट आहेत. ओमिक्रॉनचे चार सबव्हेरियंट - LF.7, XFG, JN.1 आणि NB.1.8.1 आढळले आहेत. असं भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद (ICMR) चे महासंचालक डॉ. राजीव बहल यांनी पीटीआयला सांगितलं आहे.