जाहिरात

देशात जेव्हा जेव्हा आंदोलन होते, तेव्हा निदर्शकांच्या हातात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचीच प्रतिमा का असते?

Why Dr B. R. Ambedkar face of protests India : देशात जेव्हा जेव्हा एखादे मोठे आंदोलन उभे राहते किंवा अन्यायाविरुद्ध आवाज उठवला जातो, तेव्हा आंदोलकांच्या हातात एक चित्र हमखास पाहायला मिळते.

देशात जेव्हा जेव्हा आंदोलन होते, तेव्हा निदर्शकांच्या हातात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचीच प्रतिमा का असते?
Dr B. R. Ambedkar : काळाच्या ओघात डॉ. बाबासाहेब आंबेडकर अधिक प्रासंगिक आणि मार्गदर्शक ठरत आहेत. 
मुंबई:

Why Dr B. R. Ambedkar face of protests India : देशात जेव्हा जेव्हा एखादे मोठे आंदोलन उभे राहते किंवा अन्यायाविरुद्ध आवाज उठवला जातो, तेव्हा आंदोलकांच्या हातात एक चित्र हमखास पाहायला मिळते. ते चित्र असते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे. नुकतेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांनी जल्लोष केला. आंदोलकांनी सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके यांना खांद्यावर घेतले, पण त्याहीपेक्षा उंचावर झळकत होती ती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा आणि परिसरात एकच आवाज घुमत होता - जय भीम!

नागरिकत्व कायद्याविरोधातील आंदोलन असो, शेतकऱ्यांचा ऐतिहासिक लढा असो की विद्यार्थ्यांचे आंदोलन, प्रत्येक ठिकाणी बाबासाहेब निदर्शकांना वाट दाखवताना दिसतात. काळाच्या ओघात डॉ. बाबासाहेब आंबेडकर अधिक प्रासंगिक आणि मार्गदर्शक ठरत आहेत. 

Latest and Breaking News on NDTV

भारताच्या आधुनिक इतिहासात अनेक लढाऊ नेते झाले, पण आजच्या तरुणांना बाबासाहेबांचा विचार आणि मार्ग अधिक जवळचा वाटतो. स्वतःचा आवाज ठामपणे मांडणे आणि अन्यायाविरुद्ध मुखर होणे हा त्यांचा विचार आजच्या डिजिटल युगातील तरुणांना थेट प्रेरित करतो. 'शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा' हा त्यांनी दिलेला संदेश आजही प्रत्येक चळवळीचा श्वास बनला आहे.

( नक्की वाचा : 'राष्ट्रविरोधी शक्ती गैरफायदा घेतील म्हणून...'; Dharmendra Pradhan यांनी राजीनामापत्रात काय सांगितलं? वाचा... )
 

संविधानाचा मार्ग आणि शांततापूर्ण लढा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत. त्यामुळे जेव्हा आंदोलक हातात त्यांची प्रतिमा घेतात, तेव्हा त्यामागे एक स्पष्ट संदेश असतो. आम्ही आमचा हक्क मागत आहोत, आंदोलन करत आहोत, पण ते पूर्णपणे संविधानाच्या चौकटीत राहूनच करत आहोत, ही भावना त्यातून व्यक्त होते. 

या देशात प्रदीर्घ काळ आंदोलनाचा चेहरा म्हणजे महात्मा गांधी राहिले आहेत. मात्र, काळाच्या ओघात सर्वच सरकारांनी महात्मा गांधी यांना आपापल्या योजना, धोरणे आणि सरकारी कार्यक्रमांचे प्रतीक बनवले. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना आणि प्रस्थापित व्यवस्थेला आव्हान देणाऱ्या आंदोलकांना सरकारी चिन्हापेक्षा एका अशा प्रतीकाची गरज भासते, जे प्रस्थापित व्यवस्थेला थेट आव्हान देते. आंदोलकांची ही शोधयात्रा अखेर बाबासाहेबांवर येऊन थांबते.

Latest and Breaking News on NDTV

अन्यायाविरुद्धचा वैयक्तिक संघर्ष आणि इतिहास

बाबासाहेबांचे हे विचार सहजासहजी निर्माण झालेले नाहीत. लहानपणापासूनच त्यांनी भीषण सामाजिक भेदभाव सहन केला होता. शाळेत वेगळ्या पोत्यावर बसणे असो की अस्पृश्यतेमुळे वरून पाणी पिणे असो, अत्यंत गरिबी आणि संघर्षातून शिक्षण पूर्ण करून अधिकारी झाल्यावरही त्यांना भेदभावाचा सामना करावा लागला. 

या वैयक्तिक संघर्षाला त्यांनी संपूर्ण समाजाचा लढा बनवले आणि कोट्यवधी शोषितांना न्याय मिळवून दिला. ज्या तलावावरून जनावरांना पाणी पिण्याची परवानगी होती पण माणसांना नव्हती, तिथे त्यांनी महाडचा ऐतिहासिक सत्याग्रह करून शतकानुशतके लादलेल्या गुलामगिरीच्या साखळ्या तोडल्या. मंदिरात प्रवेश नाकारल्याने मनुस्मृतीचे दहन केले आणि काळाराम मंदिर आंदोलन उभारले.

Latest and Breaking News on NDTV

राजकीय स्वार्थ आणि आजची वास्तव परिस्थिती

आजच्या राजकीय पक्षांनाही हे चांगलेच ठाऊक आहे की, देशात कोणताही समाज किंवा गट असो, सर्वाधिक प्रभाव आणि प्रासंगिकता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचीच आहे. म्हणूनच सत्ताधारी असोत वा विरोधी पक्ष, प्रत्येक नेता बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होण्यासाठी रांगेत उभा असलेला दिसतो. 

दुर्दैवाने, अनेक नेत्यांचे हे प्रेम आणि आदर केवळ दाखवण्यापुरता आणि राजकीय फायद्यासाठी असतो. कारण बाबासाहेबांची विचारसरणी, त्यांची तत्त्वे आणि आजच्या राजकीय नेत्यांची काम करण्याची पद्धत यामध्ये प्रचंड मोठी दरी दिसून येते.
 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com