Success Story: 18 लाखांची नोकरी सोडली, गावातच थाटला 'हा' व्यवसाय; आता लाखोंची कमाई!

जेव्हा आयटी बाजारावर परिणाम झाला आणि कंपनीतील प्रकल्प कमी होऊ लागले, तेव्हा त्यांना आपल्या नोकरीच्या सुरक्षिततेबद्दल तीव्र चिंता वाटू लागली.

जाहिरात
Read Time: 2 mins

Hyderabad Techie Dairy Business: आयटी उद्योगात काम करणारे अनेक लोक आयुष्यात कधी ना कधी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्न पाहतात, पण नोकरीच्या मर्यादा सोडून असे पाऊल उचलण्याचे धाडस फार कमी जण करतात. हैदराबादमधील एका ४२ वर्षीय अनुभवी तंत्रज्ञान तज्ञाने नेमकी हीच जोखीम पत्करली आणि सिद्ध केले की जर योग्य दिशेने पाऊल उचलले तर मार्ग सोपा होतो. त्यांनी कॉर्पोरेट जीवनातील सुखसोयी सोडून स्वतःचा सेंद्रिय दुग्धव्यवसाय सुरू केला आणि आज ते एक यशस्वी व्यावसायिक म्हणून स्वतःला स्थापित करत आहेत. आज ते दरमहा ३.५ लाख रुपयांचे उत्पन्न आणि १.५ लाख रुपयांचा नफा कमावतात.

Mohan Bhagwat: Gen-Z च्या आंदोलनावर मोहन भागवत काय म्हणाले? सरसंघचालकांचा सरकार अन् समाजाला 'हा' सल्ला

ही रंजक कहाणी सॉफ्टवेअर इंजिनिअर विकास ऑलवेज यांनी 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केली आहे. विकास यांच्या म्हणण्यानुसार, त्यांचे ४२ वर्षीय शेजारी, ज्यांनी उस्मानिया विद्यापीठातून बी.टेक केले होते, ते आयटी क्षेत्रात वर्षाला १८ लाख रुपयांचे पॅकेज मिळवत होते. डोनाल्ड ट्रम्प यांची सत्ता आल्यानंतर जेव्हा आयटी बाजारावर परिणाम झाला आणि कंपनीतील प्रकल्प कमी होऊ लागले, तेव्हा त्यांना आपल्या नोकरीच्या सुरक्षिततेबद्दल तीव्र चिंता वाटू लागली.

Advertisement

दुग्ध व्यवसायामुळे नशीब उजळले! 

अशावेळी नोकरी गमावण्याच्या सततच्या चिंतेऐवजी त्याने राजीनामा दिला आणि आपल्या बचतीतून सेंद्रिय दुग्ध व्यवसाय सुरू केला. या निर्णयाची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे त्याच्यावर कोणतेही कर्ज नव्हते, ज्यामुळे त्याला मुक्तपणे जोखीम पत्करण्याची मुभा मिळाली. त्याने देशी तूप, चीज, दही आणि दूध यांसारख्या सेंद्रिय दुग्धजन्य पदार्थांची विक्री सुरू केली. आज, त्याच्या कंपनीचा मासिक महसूल अंदाजे ₹३.५ लाखांपर्यंत पोहोचला आहे, ज्यापैकी अंदाजे ₹१.५ लाख थेट नफा म्हणून मिळतो.

नेटकऱ्यांमध्ये रंगली चर्चा 

त्याची कहाणी समोर आल्यानंतर, इंटरनेटवर नोकरी आणि व्यवसायाबद्दल एक नवीन चर्चा सुरू झाली. अनेक युजर्सनी "योग्य वेळी घेतलेली जोखीम व्यक्तीला आत्मनिर्भर बनवते आणि उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले करते, असं मत व्यक्त केले आहे. त्याचवेळी, काही लोकांचे म्हणणे आहे की, 'प्रत्येकाने आंधळेपणाने नोकरी सोडू नये, परंतु आपल्या बचतीतून नवीन मालमत्ता किंवा छोटा व्यवसाय सुरू करणे हे एक शहाणपणाचे पाऊल आहे.'

( नक्की वाचा : RSS ला पैसा नक्की कुठून मिळतो? गुरुदक्षिणेवर टॅक्स का लागत नाही? कसं चालतं संघाचं काम? वाचा सर्व माहिती )

Advertisement