जाहिरात

China Border: चीन सीमेवर भारताची 'पॉवर'! 16,700 फूट उंचीवर वसणार पहिलं मॉडेल गाव; वाचा काय आहे संपूर्ण प्लॅन

First Model Border Village: चीनच्या सीमेवर, जिथे श्वास घेणंही कठीण असतं आणि हाडं गोठवणारी थंडी असते, तिथे आता हिंदुस्थानच्या विजयाची एक नवी गाथा लिहिली जात आहे.

China Border: चीन सीमेवर भारताची 'पॉवर'! 16,700 फूट उंचीवर वसणार पहिलं मॉडेल गाव; वाचा काय आहे संपूर्ण प्लॅन
China Border: चीनच्या डोळ्यांत डोळे घालून उभ्या असलेल्या या गावाचा कायापालट होणार आहे.
मुंबई:

First Model Border Village: चीनच्या सीमेवर, जिथे श्वास घेणंही कठीण असतं आणि हाडं गोठवणारी थंडी असते, तिथे आता हिंदुस्थानच्या विजयाची एक नवी गाथा लिहिली जात आहे. समुद्रसपाटीपासून तब्बल 16,700 फूट उंचीवर वसलेलं लडाखमधील 'चुमुर' हे गाव आता केवळ एक सीमावर्ती भाग उरलं नसून, ते देशातील पहिलं 'मॉडेल बॉर्डर विलेज' बनणार आहे. एलजी विनय कुमार सक्सेना यांनी या ऐतिहासिक प्रकल्पाची पायाभरणी केली असून, यामुळे चीनच्या डोळ्यांत डोळे घालून उभ्या असलेल्या या गावाचा कायापालट होणार आहे.

उणे तापमानात उबदार घरांची साथ

चुमुर गावातील भौगोलिक परिस्थिती अत्यंत कठीण आहे. येथे हिवाळ्यात तापमान शून्याच्या खाली अनेक अंश घसरते. या बोचऱ्या थंडीपासून वाचण्यासाठी गावातील सर्व 24 कुटुंबांना विशेष 'थर्मल इन्सुलेटेड' घरे दिली जाणार आहेत. ही घरे 'क्लायमेट रेझिलिएंट' तंत्रज्ञानाने बनवली जातील, ज्यामुळे बाहेर कितीही बर्फवृष्टी असली तरी घराच्या आतलं तापमान राहण्यायोग्य असेल. या घरांचे काम सप्टेंबर 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: NDTV

पर्यटनातून मिळणार रोजगाराची नवी दिशा

आतापर्यंत या गावाची अर्थव्यवस्था केवळ पश्मिना शेळ्यांच्या पालनावर अवलंबून होती. मात्र, या मॉडेल विलेज प्रकल्पामुळे आता पर्यटनाचे दरवाजे उघडणार आहेत. प्रत्येक नवीन घरात एक जास्तीची खोली बांधली जाणार आहे, ज्याचा वापर 'होमस्टे' म्हणून करता येईल. यामुळे पर्यटकांना या दुर्गम भागात राहण्याची सोय मिळेल आणि स्थानिक 91 नागरिकांना उत्पन्नाचा एक कायमस्वरूपी मार्ग उपलब्ध होईल. पश्मिना उत्पादन आणि स्थानिक हस्तकलेलाही यामुळे जागतिक ओळख मिळणार आहे.

पलायन रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मास्टरप्लॅन

भारत सरकारने 2023 मध्ये 'व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राम' सुरू केला होता. सीमावर्ती भागातील गावांतून होणारे पलायन रोखणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. जेव्हा सीमेवर नागरिक राहतील, तेव्हाच सीमा अधिक सुरक्षित राहतील, असा सरकारचा ठाम विश्वास आहे. चुमुर हा या विचारसरणीचा पहिला मोठा प्रयोग असून, येथील विकास पाहून इतर सीमावर्ती गावांमधील नागरिकही आपल्या जमिनीशी जोडलेले राहतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: NDTV

सामरिकदृष्ट्या 'चुमुर' का आहे महत्त्वाचे?

चुमुर हे गाव 'लाईन ऑफ ॲक्चुअल कंट्रोल'च्या (LAC) अगदी जवळ आहे. सामरिकदृष्ट्या हे ठिकाण भारतासाठी अत्यंत संवेदनशील आहे. चीनच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आणि सीमेवर भारताची पकड मजबूत करण्यासाठी या गावाचे अस्तित्व टिकवून ठेवणे गरजेचे आहे. केवळ रस्ते किंवा पूल न बांधता, एक संपूर्ण आर्थिक परिसंस्था (Ecosystem) उभारून गावाला स्वयंपूर्ण बनवणे, हे भारताचे चीनला दिलेले एक मोठे धोरणात्मक उत्तर मानले जात आहे.

( नक्की वाचा : तुमचं पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? भारताची होर्मुजच्या कटकटीतून सुटका, आता या देशातून येणार स्वस्त तेल )
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com