Pahalgam Terror Attack : किती दहशतवादी होते हल्ल्यात सहभागी? कधी झाली होती रेकी ? वाचा सर्व Update

Jammu Kashmir Terror Attack: जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत सुरक्षा दलाच्या सूत्रांनी मोठा खुलासा केला आहे

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

Jammu Kashmir Terror Attack: जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत सुरक्षा दलाच्या सूत्रांनी मोठा खुलासा केला आहे. या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानमधल्या दहशतवादी संघटनांनी काश्मीरमधील काही लोकप्रिय पर्यटन स्थळ विशेषत: हॉटेलची रेकी केली होती. काश्मीरमधील या पर्यटन केंद्रांमध्ये पहलगाममधील काही हॉटेलांचाही सहभाग होता. मंगळवारी (22 एप्रिल) पहलगाममध्ये झालेला दहशतवादी हल्ला तीनपेक्षा जास्त दहशतवाद्यांनी केला होता, अशी माहिती सुरक्षा एजन्सीच्या सूत्रांनी दिली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

लष्कर ए तोयबा या पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्विकारली आहे. सुरक्षा एजन्सीच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एक ते सात एप्रिलच्या दरम्यान काही हॉटेलची रेकी करण्यात आली होती.

Advertisement

एकही दहशतवादी सोडणार नाही

पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्याला जबाबदार असलेल्या एकाही दहशतवाद्याला सोडणार नाही, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलंय. पंतप्रधान मोदींनी X वर या हल्ल्याच्या संदर्भात पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हंटलं आहे की, 'जम्मू काश्मीरमधल्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. ज्या लोकांनी आपल्या प्रिय व्यक्तींना गमावलंय, त्यांच्याबद्दल संवेदना व्यक्त करतो. पीडित व्यक्तींना शक्य असेल ती सर्व मदत दिली जात आहे. या घृणास्पद हल्ल्याच्यामागे जे आहेत, त्यांना न्यायालयाच्या कठड्यात आणले जाईल. त्यांना सोडले जाणार नाही! त्यांचा नापाक अजेंडा कधीच यशस्वी होणार नाही. दहशतवादाशी लढण्याचा आमचा संकल्प कायम आहे आणि तो आणखी मजबूत होईल.'

Advertisement

( नक्की वाचा : Pahalgam Terror Attack : 'भेळपूरी खात होतो, दहशतवाद्यांनी थेट गोळ्या झाडल्या', पर्यटकांनी सांगितला अनुभव )
 

कुठे झाला हल्ला?

बैसरन हे पहलगाम शहरापासून सुमारे सहा किलोमीटर अंतरावर, घनदाट पाइन जंगले आणि पर्वतांनी वेढलेले एक विस्तीर्ण गवताळ प्रदेश आहे आणि पर्यटक आणि 'ट्रेकर्स' यांचे आवडते ठिकाण आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सशस्त्र दहशतवादी 'मिनी स्वित्झर्लंड' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गवताळ प्रदेशात घुसले होते. ते तेथील भोजनालयाजवळ फिरत होते. त्यानंतर त्यांनी तिथं काश्मीरच्या निसर्गसौंदर्याचा आनंद घेत असलेल्या पर्यटकांवर गोळीबार सुरु केला. 

Advertisement
Topics mentioned in this article