Rajasthan News: केदारनाथमध्ये झालेल्या भीषण हेलिकॉप्टर अपघातातील मृत पायलटच्या आईचेही निधन झाल्याची दुःखद बातमी समोर आली आहे. 15 जून रोजी ही भीषण दुर्घटना घडली होती ज्यामध्ये पायलट पायलट राजवीर सिंह चौहान यांचे निधन झाले होते. मुलाच्या मृत्यूनंतर विरह सहन न झाल्याने १३ दिवसांनी त्यांच्या आईचेही निधन झाले.
Plane crash:विमान अपघात रोखण्यासाठी पक्षांची दिशा सरकार बदलणार? पण कशी?
समोर आलेल्या माहितीनुसार, केदारनाथ दुर्घटनेत मृत्यू झालेले पायलट राजवीर यांच्या निधनानंतर त्यांच्या आईची प्रकृती सतत खालावत होती आणि त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर त्यांना जयपूरच्या कानवटिया रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, जिथे शनिवारी राजवीर यांच्या आईने अखेरचा श्वास घेतला. पायलट राजवीर यांच्या निधनानंतर तेराव्या दिवशीच त्यांनीही जीव सोडला. या दुर्दैवी घटनेनंतर राजवीर सिंह चौहान यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित करण्यात येणारे सर्व श्रद्धांजली कार्यक्रम आणि सामूहिक कार्यक्रम सध्या रद्द करण्यात आले आहेत.
दरम्यान, १५ जून रोजी उत्तराखंडमधील केदारनाथ धामजवळील गौरीकुंड परिसरात हेलिकॉप्टर कोसळले होते. जयपूरमधील हेलिकॉप्टर अपघातात पायलट राजवीर सिंग चौहानसह 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पायलट राजवीर सिंग हे शास्त्री नगर परिसरातील रहिवासी होते आणि ते लेफ्टनंट कर्नल म्हणून लष्करातून निवृत्त झाले होते. सुमारे 14 वर्षे सैन्यात सेवा बजावल्यानंतर ते नागरी विमान वाहतूक क्षेत्रात पायलट म्हणून रुजू झाले.
राजवीर सिंग यांना 2 हजार तासांहून अधिक उड्डाणाचा अनुभव होता. ते भारतीय हवाई दलात कॅप्टन देखील होते. ऑक्टोबर 2024 मध्ये सिंग हेलिकॉप्टर एव्हिएशन कंपनीत रुजू झाले आणि हेलिकॉप्टर उडवत होते. पायलट राजवीर यांची पत्नी दीपिका देखील आर्मीमध्ये लेफ्टनंट कर्नल आहे. दोघांचे 2011 मध्ये लग्न झाले. 14 वर्षांनंतर 4 महिन्यांपूर्वी जुळ्या मुलांचा जन्म झाला.