
अहमदाबाद विमान अपघातानंतर अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी सगळे सतर्क झाले आहेत. विमान अपघात होऊ नये यासाठी यासाठी काही महत्वाची पाऊल सरकार उचलणार आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पक्षांची दिशा बदलण्याचं एक महत्वाच काम सरकार करणार असल्याची माहिती मंत्री आशिष शेलार यांनी दिली आहे. त्यामुळे सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत. पक्षांची दिशा आता सरकार कसं बदलणार हाच प्रश्न सर्वांना पडला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
विमान अपघाताची काही करणं म्हणजे इंजिन फेल होणं, किंवा इतर तांत्रिक कारणांमुळे अपघात होतात. त्यात एक मुख्य कारण आहे ते पक्षांची विमानांना होणारी धडक हे ही आहे. अनेकदा पक्षांचा थवा उडता उडता विमानाला धडकतात. त्यामुळे विमानाच्या इंजिनात बिघाड निर्माण होतो. मात्र आता हे सगळं रोखण्यासाठी सरकार आता पक्षांची दिशा बदलावण्याचं काम करणार आहे. पक्षांच्या धडकेमुळे हवाई वाहतुकीला होणारा धोका कमी करण्यासाठी मुंबई महापालिकेने पावलं उचलली आहेत.
त्यामुळे येत्या पंधरा दिवसात वर्सोवा कचरा हस्तांतरण केंद्राचे आधुनिकीकरण करुन त्याला छप्पर टाकण्याची निविदा काढून काम तातडीने सुरू करावे असे आदेश दिले आहेत. तसेच विमानतळाच्या परिसरातील कचरा संकलन केंद्र व क्षेपण भूमीवर पक्षी येऊ नयेत, यासाठी उपाय योजना सुचविण्यासाठी शास्त्रज्ञ, पर्यावरणविषयक तज्ज्ञ तसेच तरुण अभ्यासकांकडून नव्या कल्पना जाणून घ्या, असे निर्देश सांस्कृतिक कार्य, माहिती तंत्रज्ञान मंत्री आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी दिले आहेत. मुंबई विमानतळाच्या 10 किलोमीटर परिसरात कचरा क्षेपणभूमी, कांदळवन अथवा वनक्षेत्र यामुळे पक्षांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे विमान वाहतुकीला धोका निर्माण होत असतो.
विमानाला पक्षी धडकण्याच्या घटना वारंवार घडल्या आहेत. 2020 मध्ये 20 वेळा पक्षी विमानाला धडकल्याच्या घटना घडल्या होत्या. तर 2021 मध्ये 35, 2022 मध्ये 36, 2023 मध्ये 60, 2024 मध्ये 59 तर जानेवारी 2025 पासून आजपर्यंत 19 पक्षी धडकल्याच्या नोंद झाली आहे. तसेच ठाणे खाडी परिसरात येणाऱ्या परदेशी पक्षांमध्ये ही वाढ होत असल्याचे निदर्शनास आले आहे. सन 2015 मध्ये 10 हजार फ्लेमिंगो आले होते. ती संख्या वाढली असून 2024 मध्ये 2 लाख फ्लेमिंगोची नोंद झाली आहे. 50 ते 200 फूट उंचीवर 2024 मध्ये 3 पक्षी धडकले होते. 500 फूटापर्यंत 16 तर 500 ते 1000 फूटापर्यंत 13 पक्षी विमानाला धडकले होते. 3 हजार पेक्षा जास्त उंचीवर 11 वेळी पक्षी धडकल्याच्या नोंदी झाल्या आहेत.
महापालिका अधिकाऱ्यांनी या बैठकीत सांगितले की, पक्षांना रोखण्यासाठीचे कोणतेही तंत्रज्ञान सध्या पालिककडे उपलब्ध नाही. एका नव्या तंत्रज्ञानाचा वापर करुन कचऱ्याची विल्हेवाट लवकर लावण्याबाबत महापालिका विचार करीत असून याबाबतचा प्रस्ताव महापालिकेच्या विचाराधिन असल्याचे अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे ही समस्या सोडवण्याची गरज लक्षात घेऊन याचे प्रॉब्लेम स्टेटमेंट तयार करा, असे निर्देश मंत्री ॲड आशिष शेलार यांनी दिले. तसेच यावर उपाययोजनेसाठी शास्त्रज्ञ, उद्योजक, तरुण अभ्यासक, स्टार्टअप यांना आवाहन करा, त्यांच्याकडून नव नविन कल्पना मागवा, त्यांची हॅकेथॉन आयोजित करा, असेही आशिष शेलार यांनी सांगितले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world