जाहिरात

Bengaluru Mumbai Train: 30 वर्षांची प्रतिक्षा संपली! 'या' दोन शहरांना जोडणाऱ्या सुपरफास्ट ट्रेनला मंजुरी

Bengaluru To Mumbai New Superfast Train: केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही या निर्णयाला दुजोरा दिला असून, लवकरच ही सुपरफास्ट ट्रेन प्रत्यक्षात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

Bengaluru Mumbai Train: 30 वर्षांची प्रतिक्षा संपली! 'या' दोन शहरांना जोडणाऱ्या सुपरफास्ट ट्रेनला मंजुरी

Bengaluru To Mumbai New Superfast Train: देशाचे दोन अत्यंत महत्त्वाचे आर्थिक केंद्र असलेल्या मुंबई आणि बंगळूरु दरम्यान प्रवाशांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी आहे. भारतीय जनता पक्षाचे (BJP) नेते तेजस्वी सूर्या यांनी शनिवारी सांगितले की, केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने मुंबई आणि बंगळूरु दरम्यान एका नवीन सुपरफास्ट ट्रेनला (Superfast Train) हिरवा कंदील दाखवला आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही या निर्णयाला दुजोरा दिला असून, लवकरच ही सुपरफास्ट ट्रेन प्रत्यक्षात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

बंगळूरु दक्षिणचे खासदार असलेले तेजस्वी सूर्या यांनी निदर्शनास आणून दिले की, गेल्या तीन दशकांमध्ये या दोन्ही शहरांचा प्रचंड विकास झाला असला तरी, त्यांच्या दरम्यान धावणारी 'उद्यान एक्सप्रेस' (Udyan Express) ही एकमेव थेट ट्रेन आहे. ही ट्रेन दोन्ही शहरांमधील प्रवास पूर्ण करण्यासाठी २४ तासांहून अधिक वेळ घेते, ज्यामुळे अनेक प्रवाशांना वेळ वाचवण्यासाठी महागड्या विमानाने प्रवास करावा लागतो.

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी माहिती दिली की, "बंगळूरु आणि मुंबई दरम्यानची सुपरफास्ट ट्रेन आम्ही लवकरच सुरू करू. ही मागणी गेल्या ३० वर्षांपासून प्रलंबित होती. दोन्ही शहरे प्रमुख आर्थिक केंद्र असल्याने आणि त्यांच्या स्टेशनवरील क्षमता विस्तारामुळे हे आता शक्य झाले आहे."

तेजस्वी सूर्या यांनी या दीर्घकाळ प्रलंबित स्वप्नाला सत्यात उतरवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले. तसेच, रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमन्ना यांचेही त्यांनी सहकार्याबद्दल धन्यवाद व्यक्त केले. मागील वर्षी २६ लाखांहून अधिक लोकांनी हवाई मार्गे या दोन शहरांदरम्यान प्रवास केला होता.

Big News: 1 ऑक्टोबरपासून बदलणार आहेत हे 7 नियम, रेल्वे तिकीट ते UPI काय होणार बदल? वाचा एका क्लिकवर

ही नवीन सेवा सुरू झाल्यास लाखो नागरिकांसाठी प्रवास अधिक स्वस्त आणि सोयीचा होईल, तसेच दोन्ही शहरी भागातील आर्थिक आणि सामाजिक संबंध मजबूत होतील. या नवीन ट्रेनचे वेळापत्रक, वारंवारता आणि थांबे याबाबतचे सविस्तर तपशील रेल्वे मंत्रालय येत्या आठवड्यांमध्ये जाहीर करेल अशी अपेक्षा आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com