राजा रघुवंशीच्या हत्येनंतर आता सत्य सर्वांसमोर आलं आहे. मात्र हनिमूनवर गेलेला राजा आणि त्याची पत्नी सोनम बेपत्ता झाल्याचं प्रकरण इतकं गुंतागुतींचं होतं की, दोन राज्यातील पोलीस आणि सरकार दिवस-रात्र या प्रकरणाचा शोध घेत होती. मात्र याचा उलगडा होत नव्हता.
काही दिवसांनी राजा रघुवंशीच्या कुटुंबीयांना काहीच माहिती मिळाली नाही तर ते एका गुरुजींकडे गेले. या गुरुजींकडे रघुवंशी कुटुंबीयांनी मदतीची मागणी केली. त्याच वेळी गुरुजींनी कुंडली पाहून राजा रघुवंशी याचा मृत्यू झाल्याचं सांगितलं होतं. ज्यावेळी गुरुजींनी ही माहिती दिली तोपर्यंत पोलिसांना राजाचा मृतदेहही सापडला नव्हता.
राजाच्या हत्येची भविष्यवाणी करणारे गुरुजी म्हणाले...
हजारो किलोमीटर दूर एका घाटात राजाचा मृतदेह सापडला. याबाबत हत्या करणारा आणि त्याचा प्लान आखणाऱ्यांव्यतिरिक्त कुणालाच माहिती नव्हती. मात्र इंदूरमध्ये बसलेल्या एका गुरुजींनी केवळ कुंडली पाहून राजाच्या मृत्यूची भविष्यवाणी केली होती. बुधवारी NDTV ने ते गुरुजी अजय दुबे यांच्याशी बातचीत केली. यावेळी अजय दुबे यांनी धक्कादायक खुलासे केले.
पंडित अजय दुबे यांनी सांगितले की, राजा रघुवंशी यांच्या कुटुंबाने त्यांच्याशी संपर्क साधला होता. त्यानंतर ते त्याची कुंडली घेऊन माझ्याकडे आले. राजा आता या जगात नाही, असं मी त्यांना सांगितलं होतं. त्यानंतर, त्यांच्या कुटुंबाने सूनेबद्दल विचारणा केली. मग मी त्यांना सांगितले की सून सुरक्षित आहे. ती पूर्व आणि उत्तरेकडील भागात असू शकते. त्याच्या काही दिवसात राजाच्या हत्येची बाब समोर आली. त्यानंतर मी सांगितलेल्या दिशेनुसार सोनम सापडली.
अजय दुबे पुढे म्हणाले, सोनमला मंगळ आहे. जोपर्यंत तिचा मंगळ दोष उतरवला जात नाही, तोपर्यंत तिच्यासोबत अशात घटना होत राहतील. सोनमचं दुसरं लग्न झालं तरीही असंच होईल. त्यामुळे सोनमच्या वडिलांनी तिची पूजा करून घ्यायला हवी.
या प्रकरणात एका महिलेसह ३-४ लोक समोर येतील..
अजय दुबे यांनी सांगितलं की, या प्रकरणात आठ ते दहा जण सामील असू शकतात. ज्यात दोन महिला आहेत. सोनमच्या रुपात एक महिला सापडली आहे, मात्र आणखी एक महिलेचाही यात हात आहे. याशिवाय आणखी 3 ते 4 जणांचा सहभाग असू शकतो. ते पुढे म्हणाले, या प्रकरणातील सर्व सत्य समोर येण्यासाठी कमीत कमी आणखी एका महिन्याचा अवधी लागू शकतो. राजाच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी शांतीपाठ करायला हवा.
(स्पष्टीकरण- बातमीत लिहिलेल्या गोष्टी गुरुजींनी सांगितल्या आहेत. NDTV अंधश्रद्धेला प्रोत्साहन देत नाही.)