Ranchi Delhi Air Ambulance Crash: झारखंडची राजधानी रांची येथील बिरसा मुंडा विमानतळावरून दिल्लीकडे निघालेल्या खासगी चार्टर एअर अँब्युलन्सचा भीषण अपघात झाला. या विमान अपघातात सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. झारखंडमधील चतरा जिल्ह्यातील कसरिया पंचायत परिसरात विमान दुर्घटनाग्रस्त झाले. या अपघातानंतर एअरक्राफ्ट एक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) ची टीम घटनास्थळी पोहोचून मदतकार्य केले.
रांची- दिल्ली एअर अँब्युलन्सचा भीषण अपघात
समोर आलेल्या माहितीनुसार, सोमवारी संध्याकाळी झारखंडमधील चतरा जिल्ह्यातील सिमरियाजवळ एअर अॅम्ब्युलन्स कोसळली, त्यात सर्व सात जणांचा मृत्यू झाला. विमान रांचीहून दिल्लीला जात होते. रेडबर्ड एअरवेज प्रायव्हेट लिमिटेडने चालवलेले हे विमान रांची विमानतळावरून रात्री ७:११ वाजता उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच कोसळले. सोमवारी संध्याकाळी एअर ट्रॅफिक कंट्रोल (एटीसी) शी संपर्क तुटला. वृत्तानुसार, हे विमान एक एअर अॅम्ब्युलन्स होते, जे झारखंडची राजधानी रांचीहून राष्ट्रीय राजधानी दिल्लीसाठी उड्डाण करत होते.
Mira-Bhayander : पोलीस भरतीदरम्यान धक्कादायक प्रकार, बारामतीच्या उमेदवाराला रंगेहाथ पकडलं, अखेर अटक
बीचक्राफ्ट (BE9L), VTAJV हे खाजगी विमान रांचीहून १९:११ वाजता (भारतीय वेळेनुसार) उड्डाण केले. उड्डाण दरम्यान, अटालीजवळ १९:३४ वाजता (भारतीय वेळेनुसार) विमानाशी संपर्क तुटला. कोलकाता एरिया कंट्रोलने (VHF फ्रिक्वेन्सी १३२.२५) विमानाशी शेवटचा संपर्क साधला होता. वाराणसी एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या मते, विमानाने त्यांच्याशी कोणताही संपर्क साधला नाही. यानंतर, बचाव समन्वय केंद्र (RCC) २०:०५ वाजता सक्रिय करण्यात आले.
अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे:
विवेक विकास भगत: पायलट
सबराजदीप सिंग: पायलट
संजय कुमार: रुग्ण
अर्चना देवी: कुटुंब
धुरु कुमार: कुटुंब
विकास कुमार गुप्ता: डॉक्टर
सचिन कुमार मिश्रा: नर्स
Pune News : 7 दिवस पुण्यातील वाहतूक मार्गात बदल, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
रुग्णाला काय झाले होते?
डीजीसीए वेबसाइटनुसार, दिल्लीस्थित नॉन-शेड्यूल्ड फ्लाइट ऑपरेटर रेडबर्डच्या ताफ्यात सहा विमाने आहेत, ज्यामध्ये अपघातग्रस्त विमानाचाही समावेश आहे. रांचीच्या देवकमल रुग्णालयाचे सीईओ अनंत सिन्हा यांनी पीटीआयला सांगितले की, त्यांच्या एका रुग्णाने एअर अॅम्ब्युलन्सची व्यवस्था केली होती. "लातेहार जिल्ह्यातील चांदवा येथील रहिवासी संजय कुमार (४१) या रुग्णाला १६ फेब्रुवारी रोजी ६५ टक्के भाजलेल्या अवस्थेत रुग्णालयात आणण्यात आले होते. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. कुटुंबाने त्याला चांगल्या उपचारांसाठी दिल्लीला नेण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सोमवारी एअर अॅम्ब्युलन्सची व्यवस्था केली. रुग्ण दुपारी ४:३० वाजता रुग्णालयातून दिल्लीला निघून गेला."
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world