बेलपत्र एक पवित्र आणि औषधीय वृक्ष आहे. आयुर्वेदातही अनेक आजारांवर बेलपत्र हा रामबाण उपाय म्हणून उल्लेख आहे. याचा उपयोग योग, पचन सुधारणा, रोगप्रतिकार शक्ती वाढवणे आणि रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी उपयुक्त आहे. जर्नल ऑफ हर्बल मेडिसिनमध्ये प्रकाशित एका अभ्यासानुसार, बेलपत्र रक्तातील कॉलेस्टेरॉलचं प्रमाण कमी करतं आणि हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. बक्सरचे डॉ. अरुण कुमार यांच्या नेतृत्वात वैज्ञानिकांच्या एका टीमने उंदरांच्या स्तनात कॅन्सर मॉडेलवर बेलाच्या परीक्षण केलं. यातून ट्यूमरचा आकार ७९ टक्क्यांपर्यंत कमी करू शकतो.
उत्तर प्रदेशातील वैज्ञानिकांनी बेलपत्रावर अभ्यास केला. यातून अस्थमा, डायरीया, इन्सुलिनचा स्तर, केसांचा मजबूतपणा आणि आईच्या दुधाच्या गुणवत्तेच सुधारणा होण्यास फायदेशीर ठरते. बेलपत्रामध्ये कॅल्शियम, फायबर, पोटॅशियम इत्यादींसह व्हिटॅमिन ए, सी, बी६ आढळते. याशिवाय त्यात अँटीऑक्सिडंट्स देखील असतात. रिकाम्या पोटी बेलपत्र खाल्ल्याने मधुमेह तसेच रक्तदाब नियंत्रित राहतो आणि संसर्गाचा धोका राहत नाही.
नक्की वाचा - शक्ती वाढवण्यासाठी एक प्रभावी आयुर्वेदिक उपाय, पुरुष आणि महिलांसाठी फायदेशीर
बेलपत्र कधी खावे? (Bel patra kadhi khave)
ज्यांना अपचन, पोटात जळजळ, करपट ढेकर येणं किंवा पचनासंबंधित समस्या आहेत, त्यांच्यासाठी बेलपत्र फायदेशीर ठरू शकतं. यामध्ये फायबर असतं. जे पोटासाठी फायदेशीर असतं. सकाळी रिकाम्या पोटी बेलाची पानं चावल्याने पोटासंबंधित अडचणी दूर होतात. बेलपत्र रक्तातील साखरेचा स्तर नियंत्रणात ठेवतं. त्यामुळे अशा रुग्णांसाठी बेलपत्राचं नियमित सेवन फायदेशीर ठरू शकतं. मात्र ऋतूनुसार बेलपत्राचं सेवन करावे आणि हिवाळ्यात एकापेक्षा जास्त बेलपत्रे खाऊ नये.