Best Times To Consume Sweets: गोड पदार्थाचे सेवन कधी करावे, जेवणानंतर की जेवणापूर्वी? आयुर्वेदातील मोठी माहिती

Best Times To Consume Sweets: गोड पदार्थांचे सेवन जेवणाआधी करावे की जेवणानंतर, जाणून घ्या योग्य माहिती...

जाहिरात
Read Time: 2 mins
"Best Times To Consume Sweets: गोड पदार्थांचे सेवन कोणत्या वेळेस करावे?"
Canva

Best Times To Consume Sweets:आजच्या काळात नो शुगर आणि लो सोडिअम डाएटचा ट्रेंड वाढला आहे. पण खरंतर साखर आणि मीठ दोन्ही शरीरासाठी आवश्यक आहेत. फक्त त्यांचे सेवन संतुलित प्रमाणात व्हायला हवे. आजकाल फिटनेस आणि आरोग्याबाबत जागरूकता वाढल्यामुळे लोक गोड पदार्थ आहारातून वर्ज्य करू लागले आहेत. 'नो शुगर' किंवा 'लो शुगर' डाएटची क्रेझही वेगाने वाढली आहे, पण आयुर्वेदानुसार गोड पूर्णपणे सोडणे योग्य नाही. शरीराच्या संतुलनासाठी आणि ऊर्जेसाठी गोड पदार्थांचे मर्यादित प्रमाणात सेवन करणे गरजेचे मानले जाते. पण तुम्हाला माहिती आहे का की आयुर्वेदानुसार शरीरासाठी गोड पदार्थांचे सेवन करणं किती महत्त्वाचे आहे आणि त्याचे सेवन कधी तसेच किती प्रमाणात करावे? जाणून घेऊया याबाबत सविस्तर माहिती...

गोड खाण्याची योग्य वेळ कोणती?

वेळेवर घेतलेला कोणताही आहार शरीरासाठी औषधाप्रमाणे काम करतो. अन्नापासून ते पाण्यापर्यंत प्रत्येकाची एक ठराविक वेळ असते आणि जेव्हा सर्व गोष्टी निसर्गानुसार केल्या जातात, तेव्हा शरीर संतुलित राहते. त्याचप्रमाणे जर गोड पदार्थ योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने खाल्ले, तर ते शरीराला ताकद देतात, मन प्रसन्न ठेवतात आणि पचन सुधारतात. पण अति गोड किंवा चुकीच्या वेळी गोड खाल्यास लठ्ठपणा, आळस आणि अनेक आजार होऊ शकतात.

Advertisement

शरीराला ऊर्जा मिळते: गोड पदार्थ आपल्या शरीराला त्वरित ऊर्जा देतात.

(नक्की वाचा: Shashankasana Benefits: अति राग येत असेल तर काय करावे? फक्त एक सोपे आसन करा आणि मन होईल शांत)

गोड पदार्थांचे सेवन कधी करावे? जेवणापूर्वी की जेवणानंतर?

अनेकांना जेवणानंतर गोड खाण्याची तीव्र इच्छा (Cravings) होते. पण आयुर्वेदानुसार गोड पदार्थ जेवणापूर्वी खाल्ले पाहिजे. जर तुम्हाला गोड खावेसे वाटत असेल, तर घरी बनवलेला शिरा (हलवा), गूळ किंवा खजूरपासून तयार केलेल्या मिठाईचे सेवन करावे. याव्यतिरिक्त गोड फळे देखील खाऊ शकता.

हे गोड पदार्थ अजिबात खाऊ नका, कारण?

गोड पदार्थ खाण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी आइस्क्रीम किंवा डबाबंद (Packaged) पदार्थांचे सेवन टाळा. हे पदार्थ रक्तातील साखरेचे प्रमाण वेगाने वाढवतात, जे मधुमेहाच्या रुग्णांसाठी धोकादायक ठरू शकते. तसेच जेवणानंतर गोड खाणे टाळावे कारण यामुळे कफ दोष वाढतो.

(नक्की वाचा: Chia Seeds: चिया सीड्समध्ये आरोग्याचा मोठा खजिना! 14 दिवसांत वजन, पचन, हृदयाच्या आरोग्यात होतील जबरदस्त बदल)

गोड खाताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी?

लक्षात घेण्यासारखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गोड फळे आणि घरी तयार केलेले गोड पदार्थ देखील मर्यादित प्रमाणातच खावे. गोड पदार्थांचा अतिरेक केल्यास वजन वाढणे, शरीराला सूज येणे, मधुमेह, आळस आणि कफ यासंबंधित समस्यांचे कारण बनू शकतो.

Advertisement

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. ) 

(ही बातमी एनडीटीव्ही टीमने संपादित केलेली नाही. ही बातमी सिंडीकेट फीडद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. )