
Premanand Maharaj 10 Quotes: वृंदावनमध्ये वास्तव्यास असलेले प्रेमानंद जी महाराज (Premanand Ji Maharaj) यांचे प्रवचन आणि विचार लोकांना खूप आवडतात. ते आपल्या प्रवचनातून जीवन कसे जगावे, तणावापासून (Stress) कसे वाचावे आणि सत्याच्या मार्गावर कसे चालावे, याबद्दल मार्गदर्शन करतात. त्यांचे हे विचार लोकांना नवी प्रेरणा देतात. आज आपण प्रेमानंद महाराज यांचे जीवनातील वेगवेगळ्या पैलूंवर आधारित १० महत्त्वाचे प्रश्न आणि प्रेमानंद महाराज यांचे प्रेरणादायी विचार
१. खोटं बोलून सुट्टी घेणे योग्य की अयोग्य?
महाराजांच्या मते, "हा कलियुगच आहे, जो खोटं बोलायला भाग पाडतो आणि खोट्यालाच सत्य मानले जाते. पण तरीही खोटं बोलणे योग्य नाही. भलेही समस्येचा सामना करावा लागला, तरी सत्याच्या मार्गावर चालले पाहिजे आणि खोटं बोलणे टाळले पाहिजे."
२. जीवनात विजय कसा मिळेल?
"थोडीशी हानी झाली तर आता जगून काय करायचे, पराजय झाला तर जगून काय करायचे. दुःख आले तर जगून काय करायचे, परीक्षेत नापास झालो... जगून काय करायचे? आपले जीवन याच गोष्टींमध्ये अडकले आहे का? आपण तर परमेश्वराचा अंश आहोत. या वेळेस हार झाली, तर पुढच्या वेळी नक्कीच विजय होईल."
३. यशस्वी होण्याचा मंत्र काय आहे?
"गुडघे टेकणार नाही. हार मानणार नाही. मी देवाचा दास आहे, अविनाशीचा (Immortal) बाळ आहे. तुम्ही मला खाली पाडू शकत नाही. तुम्ही मला जितक्या वेळा खाली पाडाल, तितक्या वेळा मी आणखी बलवान (Strong) होईन."

४. इतरांसमोर झुकावे का?
"घाबरू नका, झुकू नका आणि कोणीही धमकावले तरी तुम्ही तुमचा निर्णय कधीही बदलू नका. कोणी कितीही मोठा असला, तरी तो देवापेक्षा मोठा नाही."
५. जीवनाचे खरे सत्य काय आहे?
"सगळे संबंध खोटे आहेत... तुम्ही कोणाच्या कामाचे आहात, म्हणून तो तुमच्यावर प्रेम करत आहे. जर कामाचे नसाल, तर कोणीही प्रेम करणार नाही."
VIDEO: रानात बसून 27 लाखांचे 'पॅकेज'; मेंढपाळाचं जबरदस्त बिझनेस मॉडेल ऐकून थक्क व्हाल!
६. जीवनात आनंदी कसे राहायचे?
"मन वारंवार मोठ्या इच्छा करतं... नकारात्मक विचार (Negative Thoughts) येतात आणि आपण त्याच गोष्टींमध्ये अडकतो... जे काही होईल ते प्रभूनेच घडवले असेल, मग काळजी कशाची आहे?"
७. खरं प्रेम काय आहे?
"कोणीही प्रेम करत नाही... जर तुम्ही मरून गेलात, तर एक दिवस रडणे होईल, दोन महिने चर्चा होईल... त्यानंतर हे सर्व संपेल. जर आपल्याला हे समजले की, इथे आपले कोणी नाही.... येथून काहीच घेऊन जायचे नाही.... घेऊन जायचे आहे, तर ते फक्त देवाचे नाव आहे."
८. नशीब बदलले जाऊ शकते का?
"तुमचा जन्म होण्यापूर्वीच हे निश्चित झाले आहे की, तुमचे लग्न कोणाशी होणार... कोणता पती मिळेल, किती दिवसांनी कोणती घटना घडेल... हे सर्व आधीच ठरलेले आहे."
९. मन नेहमी आनंदी कसे ठेवायचे?
"जशी तुमची विचारसरणी (Thinking) असेल, तशीच तुमची परिस्थिती (Situation) निर्माण होईल. प्रत्येक परिस्थितीत मन आनंदी ठेवा आणि त्याच व्यक्तीचे मन आनंदी राहते, ज्याचा देवावर विश्वास असतो."
१०. जीवनात पुढे कसे जायचे?
"खेळाडूच हारतो. धावणाराच पडतो. जो पडलेला आहे, खाली आहे, तो काय पडणार? म्हणून, चांगले बाळ आहात, पुढे वाढत राहा."
Chewing Food 32 Times Benefits: एक घास 32 वेळा चावून खाल्ल्यास कोणते लाभ मिळतात?
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world