जाहिरात

Santanchi Shikvan: तीर्थ म्हणजे काय? आयुष्यासाठी तीर्थयात्रा का आवश्यक असते? जाणून घ्या कारण

Santanchi Shikvan: भारतीय संस्कृतीमध्ये तीर्थयात्रेचे खरे महत्त्व आणि उद्देश काय आहे ते जाणून घ्या. शांतिकुंज हरिद्वारचे योगदान, मनाची निर्मळता आणि मानसिक आरोग्यासाठी तीर्थक्षेत्रांची गरज यावर सविस्तर लेख

Santanchi Shikvan: तीर्थ म्हणजे काय? आयुष्यासाठी तीर्थयात्रा का आवश्यक असते? जाणून घ्या कारण
"Santanchi Shikvan: तीर्थयात्रेचे धार्मिक महत्त्व काय असते?"
Canva

- डॉ. चिन्मय पंड्या

Tirth Yatra News: भारतीय संस्कृतीमध्ये तीर्थ म्हणजे केवळ एखाद्या पवित्र ठिकाणाचे नाव नाही तर आत्मशुद्धी, चेतना-जागृती आणि जीवन-निर्मितीची दिव्य साधना आहे. एक असा सेतू जो मनुष्याला अज्ञानाकडून ज्ञानाकडे, अशांतीकडून शांततेकडे आणि मर्यादित गोष्टीपासून ते अनंताकडे घेऊन जातो, असा 'तीर्थ' या शब्दाचा अर्थ होय. याच कारणामुळे आपल्या पूजनीय ऋषींनी तीर्थयात्रेला केवळ एक धार्मिक परंपरा मानले नसून आत्मोन्नती आणि लोकमंगलचे महान साधन मानले आहे. सनातन परंपरेशी जोडलेल्या तमाम धार्मिक ग्रंथांमध्ये तीर्थाचे धार्मिक महत्त्व सविस्तर सांगताना म्हटलंय... 

तीर्थानामुत्तमं तीर्थं विशुद्धिर्मनसः पुनः. (स्कन्दपुराण)

अर्थात सर्व तीर्थांमध्ये श्रेष्ठ तीर्थ म्हणजे मनाची निर्मळता आहे. जर अंतःकरण शुद्ध झाले नाही, तर बाह्य यात्रा अपूर्णच राहते.

भगवद्गीतेनुसार  

श्रद्धावान् लभते ज्ञानं तत्परः संयतेन्द्रियः.
ज्ञानं लब्ध्वा परां शान्तिमचिरेणाधिगच्छति. (भगवद्गीता 4.39)

अर्थात श्रद्धावान, संयमी आणि साधनापरायण व्यक्ती ज्ञान प्राप्त करून लवकरच परम शांततेचा लाभ घेते.

तीर्थयात्रेचा उद्देश काय असतो?

Latest and Breaking News on NDTV

तीर्थयात्रेचा खरा उद्देश केवळ मंदिरांचे दर्शन घेणे नाही तर स्वतःमध्ये डोकावणे, आपले दोष ओळखणे आणि श्रेष्ठ जीवनमूल्ये अंगीकारण्याचा संकल्प करणे हा आहे. तीर्थक्षेत्रांमधील सात्त्विक वातावरण, साधना, सत्संग, स्वाध्याय आणि सेवा मनुष्याच्या विचारांना नवीन दिशा देतात. दैनंदिन जीवनातील धावपळ, तणाव आणि मानसिक अस्वस्थतेपासून दूर राहून तीर्थयात्रा हे आत्मचिंतनाची अशी एक संधी बनते, जेथे व्यक्तीला स्वतःशीच नव्याने भेट होते. 

भारतीय परंपरेचे एक अत्यंत प्रेरणादायी वचन आहे-

सत्सङ्गत्वे निस्सङ्गत्वं, निस्सङ्गत्वे निर्मोहत्वम्.
निर्मोहत्वे निश्चलतत्त्वं, निश्चलतत्त्वे जीवन्मुक्तिः.

(भज गोविन्दम्)

अर्थात सत्संगाने आसक्ती नष्ट होते, त्यामुळे मोह संपतो आणि शेवटी जीवनात स्थिरता तसेच मुक्तीचा अनुभव येतो. तीर्थयात्रेचा सर्वात मोठा फायदा हाच सत्संग आणि आत्मशुद्धी आहे.

(नक्की वाचा : Devshayani Ekadashi 2026: देवशयनी एकादशी, गुरुपौर्णिमा... वाचा जुलै महिन्यातील व्रत-सणांचे महत्त्व आणि तारीख)

तीर्थयात्रा का आणि कशी करावी?

Latest and Breaking News on NDTV

तीर्थक्षेत्री नेहमी श्रद्धा, नम्रता आणि शिस्तीने गेले पाहिजे. तिथे स्वच्छता राखणे, स्थानिक परंपरांचा आदर करणे आणि सेवा, साधना, सत्संगात सहभागी होणे तीर्थयात्रेला सार्थकी लावते. जर तीर्थक्षेत्रावरून परत आल्यानंतर आपले विचार अधिक निर्मळ, व्यवहार अधिक नम्र आणि जीवन अधिक सेवाभावी बनले, तरच तीर्थयात्रेचा खरा उद्देश पूर्ण झाला असे मानले जाऊ शकते.

उपनिषदांची ही घोषणा देखील तीर्थयात्रेच्या याच दिशेला दुजोरा देते-

सत्येन लभ्यस्तपसा ह्येष आत्मा सम्यग्ज्ञानेन ब्रह्मचर्येण नित्यम्.
(मुण्डकोपनिषद् 3.1.5)

अर्थात आत्म्याची अनुभूती सत्य, तप, सम्यक् ज्ञान आणि शिस्तबद्ध जीवनाने होते; केवळ बाह्य कर्मकांडाने नाही.

सेवा, साधना आणि संस्कारांशी जोडलेले गायत्री तीर्थ

Latest and Breaking News on NDTV

याच दृष्टीने गायत्री तीर्थ शांतिकुंज, हरिद्वार हे आधुनिक भारताचे एक जिवंत तीर्थ आहे. युगऋषी पं. श्रीराम शर्मा आचार्य आणि वंदनीय माता भगवती देवी शर्मा यांच्याद्वारे स्थापित झालेली ही तपोभूमी साधना, स्वाध्याय, सेवा आणि संस्कार यांचे एक एकत्रित केंद्र आहे. येथे येणाऱ्या साधकांना, तरुणांना आणि कुटुंबांना केवळ धार्मिक अनुष्ठानांची संधीच मिळत नाही तर जीवन-निर्मिती, कुटुंब-निर्मिती आणि समाज-निर्मितीची व्यावहारिक प्रेरणाही मिळते. येथे तीर्थाचा अर्थ केवळ दर्शन नाही तर जीवनात दिव्यतेचे अवतरण आहे.

आजचा तरुण तणाव, भौतिकता आणि तीव्र स्पर्धेमुळे मानसिक असंतुलनाचा अनुभव घेत आहे. अशा काळात तीर्थक्षेत्रे केवळ आस्थेची केंद्रे न राहता, मानसिक स्वास्थ्य, आत्मचिंतन आणि सकारात्मक ऊर्जेची सशक्त केंद्रे बनू शकतात. गरज या गोष्टीची आहे की, तीर्थक्षेत्रे भाविकांच्या आणि तरुणांच्या गरजांनुसार स्वच्छ, सुव्यवस्थित, ज्ञानमय, सेवाभावी आणि पर्यावरणास अनुकूल असावी. त्यांची व्यवस्था पारदर्शक असावी आणि संसाधनांचा वापर शिक्षण, आरोग्य, पर्यावरण संरक्षण, संस्कार संवर्धन आणि जनकल्याण यासारख्या रचनात्मक कार्यांमध्ये व्हावा, ज्यामुळे तीर्थक्षेत्रे खरोखरच समाज परिवर्तनाची प्रेरक केंद्रे बनू शकतील.

तीर्थक्षेत्र कसे असावे?

Latest and Breaking News on NDTV

युगऋषी पं. श्रीराम शर्मा आचार्य यांनी आपल्या साहित्यात स्पष्ट केले आहे की, तीर्थक्षेत्रे केवळ पूजा-अर्चनेची ठिकाणे असू नये तर ती अशी जिवंत चेतना-केंद्रे बनली पाहिजेत जिथे व्यक्तीचे चरित्र-निर्माण, विचार-शुद्धी आणि जीवनाचा उत्कर्ष होईल. त्यांच्या मते खरे तीर्थ तेच आहे, जिथून परत आल्यानंतर मनुष्य अधिक संस्कारित, अधिक जबाबदार आणि अधिक सेवाभावाने ओतप्रोत होऊन समाजासाठी जगण्याचा संकल्प करून येईल.

गायत्री तीर्थ शांतिकुंजने हे आदर्श व्यवहारात आणून हे सिद्ध केले आहे की, तीर्थ केवळ एक यात्रा नसून जीवन परिवर्तनाची मोहीम आहे. जेव्हा श्रद्धा सेवेशी जोडली जाते, साधना विज्ञानाशी जोडली जाते आणि अध्यात्म राष्ट्रनिर्माणाशी जोडले जाते, तेव्हाच तीर्थयात्रेला त्याचे खरे महत्त्व प्राप्त होते.  

शेवटी भारतीय संस्कृतीचा हाच शाश्वत संदेश आहे-

सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः. सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद्दुःखभाग्भवेत्|

तीर्थयात्रेचा अंतिम उद्देशही हाच आहे की व्यक्तीच्या अंतर्मनात शांततेचा उदय व्हावा, त्याचे जीवन संतुलित व्हावे आणि तो आपल्या सुखाला संपूर्ण समाजाच्या कल्याणाशी जोडून पाहू शकेल. हेच भारतीय तीर्थयात्रा परंपरेचे मूळ तत्त्वज्ञान आहे आणि हाच मानवतेच्या उज्ज्वल भविष्याचा आधारही आहे.

(लेखक- देवसंस्कृती विश्वविद्यालयाचे प्रतिकुलपती आणि प्रसिद्ध आध्यात्मिक विचारवंत आहेत.)

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com