जळगाव: जो वक्त की कदर करता है वक्त उसकी कदर करता है, असे अजित दादांच काम आहे, आम्ही अजित दादाला उगाच मानत नाही... अजित दादा आम्ही आंधळा प्रेम केलं नाही, असे म्हणत एक ना एक दिवस तरी अजित दादा राज्याचे मुख्यमंत्री होणार असा विश्वास राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी व्यक्त केला. जळगावमध्ये ते एका कार्यक्रमात बोलत होते.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
जळगावच्या अंमळनेर येथे विविध विकास कामांचा उद्घाटन सोहळा राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते पार पडले. अमळनेर येथील कार्यक्रमात भाषणात मंत्री बाबासाहेब पाटील यांनी अजित पवार हे एक ना एक दिवशी मुख्यमंत्री होतील असा विश्वास करत त्यांच्या कामाचे कौतुक केले. अशा माणसाकडे राज्याचे नेतृत्व गेल्यास विकास झाल्याशिवाय राहणार नाही, असंही ते म्हणाले.
'जो वक्त की कदर करता है वक्त उसकी कदर करता है असा अजित दादाचे काम आहे. आम्ही अजित दादाला उगाच मानत नाही, अजित दादा आम्ही आंधळा प्रेम केलं नाही. कारण माणसात धमक आहे काम करायची अजित दादांची प्रशासनावर पकड आहे.सकाळी सात वाजेपासूनच काम करतात, मी अजूनपर्यंत दादा झोपले आहेत असं ऐकलेलं नाही, दादा झोपले आहेत, थकून आले आहेत, उशीर झाला आहेत असं माझ्या एवढ्या दिवसाच्या राजकारणात मी अजूनपर्यंत ऐकलेलं नाही," असं बाबासाहेब पाटील म्हणाले.
( नक्की वाचा : केमिस्ट्रीच्या शिक्षिकेवर नवऱ्याच्या हत्येचा आरोप, कोर्टात असा केला युक्तिवाद की न्यायाधीशही थक्क! पाहा Video )
तसेच "अशा माणसाच्या हातात नेतृत्व गेलं तर महाराष्ट्राची प्रगती झाल्याशिवाय राहत नाही. त्यामुळेच एक ना एक दिवस तरी अजित दादा हे राज्याचे मुख्यमंत्री होणार आहेत. कार्यकर्त्याला कसे जपावे दादांकडून शिकावं आणि त्यामुळे मी असेल किंवा अनिल दादा आम्ही उगाच निर्णय घेतला नाही. कार्यकर्त्याला जीव लावला की जीव जाईपर्यंत दादा त्यांच्यावर प्रेम करतात. प्रत्येक समाजाची आणि महाराष्ट्रातील प्रत्येक विषयाची दादांना सखोल माहिती आहे," असंही ते पुढे बोलताना म्हणाले.