Bachchu Kadu Protest : बच्चू कडूंच्या आंदोलनाचा सातवा दिवस, बावनकुळेंसोबतची चर्चा फिस्कटली; काँग्रेसचा पाठिंबा

या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी आलेले पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि बच्चू कडू यांच्यामधील चर्चा फिस्कटली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

गेल्या सहा दिवसापासून बच्चू कडू यांचं अमरावतीच्या गुरुकुंज मोझरी येथे अन्यत्याग आंदोलन सुरू आहे. आज त्यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा सातवा दिवस आहे. अद्यापही आंदोलनावर तोडगा काढण्यात आलेला नाही. दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करून हर्षवर्धन सपकाळ यांनी यासंदर्भात माहिती दिली. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेस राज्यभर संघर्ष करत आहे. काँग्रेसचा हा संघर्ष आगामी काळात आणखी तीव्र होणार, अशी माहिती हर्षवर्धन सपकाळ यांनी सोशल मीडियावरुन दिली. 

चंद्रशेखर बावनकुळेंसोबतची चर्चा फिस्कटली...


या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी आलेले पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि बच्चू कडू यांच्यामधील चर्चा फिस्कटली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी बच्चू कडू यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत फोनवरून बोलणं करून दिलं आहे. मुख्यमंत्र्यांशी बोलूनही बच्चू कडूंच समाधान न झाल्यामुळे उपोषण सुरूच राहणार आहे. 

Advertisement

Advertisement

नक्की वाचा - Education City: नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय एज्युकेशन सिटीची उभारणी, 5 विदेशी विद्यापीठांना देणार इरादापत्र

कर्जमाफी देण्यासाठी समिती गठीत करू असं पालकमंत्र्यांकडून सांगण्यात आलं आहे. मात्र समिती कधी गठीत करणार हे स्पष्ट नसल्याने बच्चू कडू उपोषणावर ठाम आहेत. अहमदाबादच्या घटनेनंतर राष्ट्रसुन्न आहे. बच्चू कडूंनी उपोषण मागे घ्यावे अशी विनंतीही बावनकुळेंकडून करण्यात आली होती. मात्र कार्यकर्त्यांशी बोलून आपण निर्णय घेऊ असं कडूनी म्हटलं आहे. 

Advertisement

आंदोलन सोपं नसतं, बच्चू कडूंच्या पत्नीकडून भावनिक साद 


तुमची बहीण म्हणून सांगते चंद्रशेखर भाऊ, कोण्याही आंदोलकाला आंदोलन हे सोप नसतं. तुम्ही एक दिवस उपवास केला, माननीय देवेंद्रजींनी एक दिवस उपवास केला तर अमृता वहिनींची काय स्थिती होते हे लक्षात घ्या.  अशा शब्दात बच्चू कडूंच्या पत्नी डॉ. नयना कडू यांनी बच्चू कडूंच्या उपोषणस्थळी आलेल्या चंद्रशेखर बावनकुळे यांना ठणकावलंय. शेतकऱ्याला आनंदाने जगता यावं असं नियोजन करण्याची अक्कल कोणत्याही भारतीय राजकारण्याला राहिली नाही का? नयना कडूंचा राजकारण्यांना सवाल. बच्चू कडू पाचव्यांदा अन्नत्याग आंदोलन करत आहेत. त्यांना सुळावर घालण्यासाठी त्यांच्या आईने जन्म दिलाय का, नयना कडू भाषणादरम्यान भावुक झाल्या. 

Topics mentioned in this article