
भुपेंद्र अंबवणे, भिवंडी: भिवंडीतील कामवारी नदीत बुडून दोघा सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. एक भाऊ एक भाऊ बुडत असता दुसरा वाचवण्यासाठी गेला असता दोघे भाऊ बुडाले अन् ही दुर्घटना घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून 15 तासांच्या शोधानंतर दोन्ही भावांचे मृतदेह बाहेर काढण्यात आलेत.
( नक्की वाचा : Satara News : सातारा जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवरील बंदी हटवली, मात्र प्रशासनाचे कडक निर्देश )
समोर आलेल्या माहितीनुसार, भिवंडी तालुक्यातील गोरसई गावातील कामवारी नदीत पात्रात मासेमारीचे जाळे काढण्यासाठी गेलेल्या गोरसई गावातील अक्षय परशुराम धुमाळ (25) हा भोवऱ्यात अडकला. हे पाहून त्याला मदत करण्यासाठी गेलेले त्यांचे नातेवाईक कैलास शांताराम ठाकरे पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे परत आले. पण अक्षयला बुडताना पाहून त्याचा मोठा भाऊ सागर परशुराम धुमाळ (30) विवाहित, यानेही पोहायला येत नसतानाही नदीत उडी मारली.
ज्यामुळे दोन्ही भावांचा नदीच्या पाण्यातील भोवऱ्यात बुडून मृत्यू झाला. त्यांचे नातेवाईक कैलाश शांताराम ठाकरे यांनी सांगितले की, सागरचे लग्न फक्त ४ वर्षांपूर्वी झाले होते आणि त्यांना ३ वर्षांची मुलगी आहे. या घटनेनंतर गावात शोककळा पसरली आहे. काल दुपारी 4.30 वाजता कामवारी नदीत दोन्ही भाऊ बुडाले होते. भिवंडी अग्निशमन दलाच्या पथकाने संध्याकाळी ७:३० वाजेपर्यंत त्यांचा शोध घेतला पण ते सापडले नाहीत.
Mumbai Lakes : मुंबईकरांसाठी Good News, एकाच दिवसात 12 टक्के पाणीसाठा वाढला
पण गावकऱ्यांनी हिंमत गमावली नाही आणि शोध सुरूच ठेवला. आज सकाळी 8 वाजण्यापूर्वी, गावकऱ्यांनी मोठा भाऊ सागरचा मृतदेह नदीतून बाहेर काढला आणि काही मिनिटांनी, धाकटा भाऊ अक्षयचा मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आला. दोघांचेही मृतदेह भिवंडी शहरातील सरकारी इंदिरा गांधी रुग्णालयात आणण्यात आले आहेत. शवविच्छेदनानंतर मृतदेह त्यांच्या गावी आणले जातील. त्यांचे अंतिम संस्कार गावामध्ये करण्यात येतील.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world