Chhatrapati Sambhajinagar : जगप्रसिद्ध अंजिठा लेणीत तब्बल 200 पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला; नागरिकांमध्ये घबराट

तुम्ही पर्यटनाच्या ठिकाणी गेलात आणि अशा ठिकाणी तुम्हाला मधमाशा चावल्या तर काय कराल?

जाहिरात
Read Time: 2 mins

गडकिल्ले किंवा पुरातन वास्तूच्या ठिकाणी मधमाशांच्या हल्ल्याच्या अनेक घटना वारंवार समोर येत असतात. अनेकदा मधमाशांच्या चाव्यामुळे मृत्यू झाल्याच्याही घटना समोर आल्या आहेत. दरम्यान छत्रपती संभाजीनगरमधील जगप्रसिद्ध अंजिठा लेणीत आग्या मोहोळ मशमाशांच्या हल्ल्याचे सत्र सुरूच आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

चार दिवसांपूर्वी पुणे येथे मधमाशांना 50 पर्यटकांना चावा घेतल्याची घटना ताजी असताना शनिवारी दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास दोनशेहून अधिक पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला चढविला. यात अनेक पर्यटक जखमी झाले आहेत. बकरी ईदची सुटी आणि विकेंड असल्यामुळे शनिवारी लेणी बघणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली होती. सकाळपासूनच लेणीत पर्यटकांची संख्या वाढल्याने खबरदारीचा उपाय म्हणून भारतीय पुरातत्व विभागाच्या वतीने लेणी क्र. 8 समोर कर्मचारी पर्यटकांना मधमाशांपासून बचाव करण्यासाठी आवश्यक त्या सूचना देत होते. पण असे असताना अचानक दुपारी मधमाशांनी पर्यटकांवर हल्ला केला.

नक्की वाचा - Shirdi Crime : शिर्डीत 150 रुपयांसाठी मृत्यू, पीडित झोपेत असताना कानाखाली मारली; जागीच ठार


स्थानिक भाषेमध्ये मधमाशांना आग्या मधमाशी तर पोळ्याला आग्या मोहोळ म्हणतात. या मधमाशीचे घरटे आकारमानाने मोठे असते. हे पोळे खडक, झाडाची मोठी फांदी किंवा उंच इमारतीच्या छताला चिकटलेलं असतं. या मधमाशाच्या इतर मधमाशांपेक्षा जास्त चिडखोर असतात. त्या तीव्रतेने डंख मारतात.

मधमाशी चावल्यास काय करावं?

Advertisement

तुम्ही पर्यटनाच्या ठिकाणी गेलात आणि अशा ठिकाणी तुम्हाला मधमाशा चावल्या तर काय कराल? मधमाशी चावल्यावर शरीरात भूल देणारं रसायन सोडते. अशावेळी डंख काढणे महत्त्वाचे असते. अशावेळी तो भाग स्वच्छ साबणाने धुवून घ्यावा. यानंतर वेदना आणि सूज कमी करण्यासाठी बर्फ लावा. त्याऐवजी मध, चुनाही लावला जातो. 

Topics mentioned in this article