
मुंबईत (Mumbai News) संसदेत विधीमंडळाच्या अंदाज समितीच्या (Estimate committee Royal Meal) सदस्यांनी शाही भोजनाचा बेत करण्यात आला होता. सध्या या शाही भोजनावर मोठी चर्चा सुरू झाली आहे. काटकसर कशी करावी याची तजवीज करण्यासाठी नेमण्यात आलेल्या अंदाज समितीच्या सदस्यांसाठी चक्क चांदीच्या ताटात (Royal Meal) जेवण देण्यात आलं. या जेवणासाठी मेजवाणी देण्यात आली होती. यामध्ये चिकम खिमा पॅटीस, सुरमई फ्राय, मटण बिर्याणी, वेज बिर्याणी, पुरणपोळी, बादशहा फालुदासारख्या खाद्यपदार्थांची सोय करण्यात आली होती.
यावरुन सध्या राजकीय वादंग सुरू झाला आहे. या शाही भोजनासाठी प्रत्येक सदस्यामागे तब्बल साडे चार हजार रुपयांचा खर्च करण्यात आल्याची चर्चा आहे.
नक्की वाचा - Saquib Nachan Death : साकिब नाचनच्या मृत्यूनंतर दहशतवादाचं 'पडघा मॉडेल' चर्चेत; गावाबाहेरील पोलीस बंदोबस्त वाढवला
मुंबईत विधानभवनात देशभरातील विधीमंडळ समित्यांचे अध्यक्ष आणि सदस्यांचं दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. याचा मंगळवारी समारोप झाला. विशेष म्हणजे या अंदाज समितीच्या माध्यामतून अर्थसंकल्पातील तरतुदीचे उद्दिष्ट्य साध्य करण्यासाठी कशी काटकसर करता येईल याबाबत शिफारदी दिली जात असतात. अशा समितीला चांदीच्या ताटातून शाही भोजन देण्यात आलं होतं.

विरोधकांकडून संताप...
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं आश्वासन दिलं मात्र ते पूर्ण झालं नाही, धान उत्पादक शेतकरी संकटात आहे. धानाला बोनस देण्याची घोषणा केली त्याचाही पत्ता नाही. कोतवालांना मानधन नाही, कर्मचाऱ्यांचे पगार 10 ते 12 दिवस उशिरा चालले आहे. दहा लाख कोटींचा सरकारवर कर्ज झालेला आहे, असा आर्थिक संकटात असल्यावर एवढा बडेजाव का दाखवायचा ? असा आरोप विजय वडेट्टीवारांनी केला आहे. राज्य दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. अशा स्थितीत चांदीच्या ताटात साडेचार पाच हजार रुपयांचा जेवण देण्याची काय गरज? असाही सवाल त्यांनी उपस्थित केला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world