कुठे राहायला जायचे?; या क्षुल्लक कारणावरुन बायकोची हत्या

गुराप्पा नोकरीच्या निमित्ताने गेल्या काही महिन्यांपासून विटा येथे पत्नी आणि लहान मुलीसोबत वास्तव्यास होता. विट्यातील खानापूर नाका परिसरातील भाड्याच्या खोलीत ते राहत होते. 

Advertisement
Read Time: 2 mins

शरत सातपुते, सांगली

सांगलीच्या विटामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.पती-पत्नीमध्ये किरकोळ कारणावरून वाद होऊन पतीने डोक्यात खोरे घालून पत्नीचा खून केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

भाड्याने राहायला कोणत्या घरात जायचे या क्षुल्लक कारणावरून पती-पत्नीमध्ये भांडण झालं होतं. या वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात खोरे मारून तिची निर्घृणपणे हत्या केली. बुधवारी रात्री 10 ते 10 वाजेच्यादरम्यान विटा येथील खानापूर नाका परिसरात ही घटना घडली आहे. 

(नक्की वाचा- एकतर्फी प्रेमातून तरुणीवर जीवघेणा हल्ला; कैचीच्या साहाय्याने मानेवर वार, आरोपी अटकेत)

विटा पोलिसांनी या प्रकरणी संशयित पतीला अटक केली आहे. गुराप्पा शंकराप्पा इकुरोट्टी  संशयित पतीचे नाव आहे. तर सलमा गुराप्पा इकुरोट्टी असे मृत महिलेचे नाव आहे. गुराप्पा नोकरीच्या निमित्ताने गेल्या काही महिन्यांपासून विटा येथे पत्नी आणि लहान मुलीसोबत वास्तव्यास होता. विट्यातील खानापूर नाका परिसरातील भाड्याच्या खोलीत ते राहत होते. 

(नक्की वाचा - धार्मिक कार्यक्रमांमधील निष्काळजीपणामुळे यापूर्वीही हजारो लोकांचा गेलाय बळी, जाणून घ्या कुठे-कुठे झाले होते अपघात)

बुधवारी रात्री विट्यातील हजारे मळा परिसरात भाड्याच्या घरात राहायला जाण्याच्या कारणावरून त्यांच्यात वाद झाला होता. यातूनच पतीने रागात पत्नीच्या डोक्यात खोरे घातले. यात पत्नीचा मृत्यू झाला. पोलिसांनी याबाबत खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

Advertisement
Topics mentioned in this article