Jalindar Supekar : साताऱ्यातील 'वासनाकांड' प्रकरणावरून वादंग; अखेर IPS जालिंदर सुपेकरांचं स्पष्टीकरण

जालिंदर सुपेकर यांच्याविरोधात 2000 साली साताऱ्यात एक मोर्चा निघाला होता. जालिंदर सुपेकर हे त्या काळात सातारा येथे उपविभागीय पोलिस अधिकारी (DYSP) म्हणून कार्यरत होते. सध्या हे प्रकरण पुन्हा चर्चेत आलं आहे. अखेर सुपेकरांनी त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

विशाल पाटील, प्रतिनिधी

जालिंदर सुपेकर यांच्याविरोधात 2000 साली साताऱ्यात एक मोर्चा निघाला होता. जालिंदर सुपेकर हे त्या काळात सातारा येथे उपविभागीय पोलिस अधिकारी (DYSP) म्हणून कार्यरत होते. त्याच सुमारास "हिरवा शालू" नावाचा एक चित्रपट साताऱ्यात तयार होणार असल्याची चर्चा सुरू झाली. या चित्रपटासाठी नटींची निवड होणार असल्याची बातमी पसरली आणि अनेक मुली संबंधितांशी संपर्क साधला. काही मुलींनी आपली माहिती, फोटो वगैरे संबंधितांकडे जमा केले. त्यानंतर काही मुलींना रानावनात नेऊन 'कास्टिंग'च्या नावाखाली भेटी घेतल्या गेल्याचं समोर आले.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

दरम्यान या काळात काही उच्चभ्रू लोकांनी पोलिसांकडे पैसे देऊन प्रकरण मिटवल्याची कुजबूज सुरू होती. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर जालिंदर सुपेकरांचं नाव पुन्हा चर्चेत आलं. अखेर साताऱ्यातील वासनाकाडं प्रकरणावर जालिंदर सुपेकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

नक्की वाचा - Crime News : 41 लाखांची लाच, घरात 50 लाखांचं सोनं; संभाजीनगरच्या लाचखोर उपजिल्हाधिकाऱ्याविरोधात मोठी कारवाई

जालिंदर सुपेकरांकडून स्पष्टीकरण?

2001-2002 म्हणजेच सुमारे 24 वर्षांपूर्वी सातारा येथे उपविभागीय पोलीस अधिकारी या पदावर असताना 'हिरवा शालू' या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी निर्मात्याने इतर काही लोकांच्या मदतीने त्या चित्रपटामध्ये काम करण्यास इच्छुक असलेल्या पीडित तरुणींवर अत्याचार केले. ह्या बाबत दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास माझ्याकडे होता. सदर गुन्ह्याचा तपास अत्यंत क्लिष्ट आणि संवेदनशील होता. त्यामध्ये चारित्र्यहनन होईल, ह्या भीतीने कोणतीही पीडित महिला समोर यायला तयार नव्हती.

Advertisement

मी आणि माझ्या पथकाने त्यांना विश्वासात घेऊन व त्यांच्याशी संवेदनशीलपणे संवाद साधला. सदर गुन्ह्याची व्याप्ती व क्लिष्टपणा लक्षात घेता मोठ्या प्रमाणात साक्षीदार तपासावे लागले. त्यामुळे गैरसमजातून सातारा येथे मोर्चा निघाला होता. त्यावेळेसच मी मोर्चामधील लोकांच्या शंकांचे निरसन केले होते. सदर गुन्ह्याच्या तपासाबाबत कोणत्याही पीडितेने कधीही कोणतेही आरोप तपासी यंत्रणांवर केलेले नाहीत .सदर गुन्ह्यामध्ये आरोप सिद्ध झाले असून आरोपींना शिक्षा झाली आहे व पीडितांना न्याय मिळाला आहे.