SSC Result : देशसेवा केल्यानंतर अपूर्ण स्वप्न केलं पूर्ण, माजी सैनिक मुलासोबत झाले दहावी पास

SSC Result 2025 : आहिल्यानगरचे माजी सैनिक त्यांच्या मुलासोबत दहावीची परीक्षा पास झाले आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

प्रसाद शिंदे, प्रतिनिधी

Maharashtra Board MSBSHSE SSC Result 2025 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) महाराष्ट्र दहावीचा (इयत्ता 10वी) निकाल समोर आला असून राज्यातील 94.10 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

जगण्यातील रोजच्या संघर्षाला सामोरं जात असताना काही जणांना दहावीची परीक्षा देता येत नाही. त्यांचे शिक्षण अपूर्ण राहतं. असे काही जण देखील पुन्हा दहावीची परीक्षा देतात. त्यांना मिळालेलं यश हे सर्वांच्या चर्चेचा विषय ठरतं. आहिल्यानगरमधील माजी सैनिकानं देखील दहावीच्या परीक्षेत यश मिळवलं आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

राज्यात आज (मंगळवार, 13 मे) झालेल्या परीक्षेत अहिल्यानगर शहरातील भाई सथ्थानाईट  हायस्कूल या रात्र शाळेत शिक्षण घेणारे माजी सैनिक अंकुश गजा बापू पानमंद हे 60 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत 

अंकुश हे 2004 साली सैन्यात भरती झाले होते. त्यानंतर त्यांना दहावीची परीक्षा देणे झाले नाही. ती खंत त्यांना सतावत होती. सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर अंकुश यांनी यावर्षी दहावीची परीक्षा दिली आणि ते त्यामध्ये उत्तीर्ण झाले. विशेष म्हणजे त्यांचा मुलगा साहिल अंकुश पाणमंद हा देखील त्यांच्याबरोबर यावर्षी दहावी परीक्षेला होता. त्याला देखील 74 टक्के गुण मिळाले आहेत.

Advertisement

बाप लेकाने एकत्र अभ्यास करून दहावी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा आनंद पाणमंद यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. 

( नक्की वाचा : SSC Result : वडापाव विक्रेत्या महिलेनं 32 वर्षांनी दिली दहावीची परीक्षा, परिस्थितीवर मात करत मिळवलं यश )
 

कसा लागला दहावीचा निकाल?

यंदा राज्यातील 94.10 टक्के विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. यंदाही कोकण विभागाने बाजी मारली असून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल सर्वात जास्त 99.32 टक्के इतका लागला आहे. तर सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा असून गडचिरोली जिल्ह्याचा निकाव सर्वात कमी 82.67 टक्के इतका लागला आहे. 

राज्यातील 96.14 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या असून मुलं उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 92.31 इतकी आहे. राज्यातील एकूण 15 लाख 58 हजार 20 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यातील एकूण 14 लाख 55 हजार 433 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 

Advertisement