Maratha Reservation: मनोज जरांगेंच्या उपोषणावर तोडगा निघणार? मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत मोठा निर्णय

आधी चर्चा जरांगे समवेत करतील. त्यानंतर काही प्रश्न उद्भवत असतील तर पुन्हा बैठक घेऊ त्यानंतर  भाष्य करू," असं विखे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

Manoj Jarange Patil Protest: मुंबईच्या आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरु आहे. आज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस असून सरकारकडून हे उपोषण सोडवण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. याचसंदर्भात राज्य सरकारच्या मराठा आरक्षण उपसमितीची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या  आंदोलनाच्या प्रश्नावर सकारात्मक भूमिका घेतली असल्याची माहिती  दिली आहे.

काय म्हणाले राधाकृष्ण विखे पाटील?

"आम्हा सर्वांची मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बैठक पार पडली. या बैठकीत सर्व मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाली. मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करण्यासाठी कोकण विभागीय आयुक्त न्यायमूर्ती शिंदे यांच्यासह, विभागाचे सचिव सुर्यवंशी भेटण्यास जातील. ते आधी चर्चा जरांगे समवेत करतील. त्यानंतर काही प्रश्न उद्भवत असतील तर पुन्हा बैठक घेऊ त्यानंतर  भाष्य करू," असं विखे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. 

Maratha Reservation: मनोज जरांगेंची 'ती' मागणी अखेर मान्य! राज्य सरकारचा मोठा निर्णय; थेट शासन निर्णय काढला

"मराठा आरक्षणाचा प्रश्न राजकारण न करता सोडवावा, अशी महायुतीची भूमिका आहे आणि सर्व नेते यावर एकजूट आहेत. आंदोलनासाठी लागणाऱ्या सोयीसुविधा, जसे की पाणी, वीज आणि स्वच्छतागृहे उपलब्ध करून देण्याचे आदेश पालिका आयुक्तांना दिले आहेत. चिखल जास्त आहे त्यामुळे आंदोलनांना त्रास होत आहे. सध्या ही मनोज जरांगे पाटील यांची भेट झाल्यानंतर त्यासंदर्भात सविस्तर माहिती देऊ," असेही ते म्हणाले. 

 यावेळी बोलताना विखे पाटील यांनी विरोधकांनाही चांगलेच सुनावले. संजय राऊत यांच्या सूचनांची सरकारला गरज नाही, असे सांगत विखे पाटील यांनी त्यांच्या अडीच वर्षांच्या काळात मराठा आरक्षणाचा प्रश्न का सोडवला नाही, असा सवाल उपस्थित केला. तसेच मुंबईतील रेस्टॉरंट बंद केली गेल्याचा आणि वीज तोडल्याचा आरोप विखे पाटील यांनी चुकीचा असल्याचे म्हटले आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आझाद मैदानात संध्याकाळी ६ नंतर वीज नसते, असे त्यांनी स्पष्ट केले. रोहित पवार आणि त्यांच्यासारखे नेते केवळ राजकारण करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

दरम्यान, मनोज जरांगेंच्या दोन मागण्यांवर सरकारने सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यापैकी मराठा आंदोलनात दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याबाबत सरकार सकारात्मक असून गंभीर गुन्हे वगळता आंदोलनात दाखल झालेले गुन्हे माघारी घेण्याची सरकारची तयारी आहे. तसेच आंदोलनादरम्यान मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना आर्थिक मदतीसोबतच सरकारी नोकरीमध्ये सामावून घेण्याबाबत सरकार सकारात्मक विचार करत आहे. 

Manoj Jarange Patil: 'दुसऱ्यांचे आरक्षण मागत नाही, सरकारने गैरसमज पसरवू नये', मनोज जरांगे