जाहिरात

Monsoon Update : मान्सून कोकणात धडकला, शेतकऱ्यांनो पेरणी कधी कराल? हवामान विभागाने सांगितला नेमका कालावधी 

मान्सून दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील काही भागांमध्ये 9 जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे.

Monsoon Update : मान्सून कोकणात धडकला, शेतकऱ्यांनो पेरणी कधी कराल? हवामान विभागाने सांगितला नेमका कालावधी 

Mumbai News : मान्सून दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील काही भागांमध्ये 9 जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. मात्र त्यानंतर किमान 15 जूनपर्यंत राज्यातील पावसाचा एकंदरीत जोर तसेच मान्सूनच्या प्रगतीचा वेग कमी होण्याची शक्यता हवामानाच्या सध्याच्या अंदाजातून दिसून येत आहे. त्यामुळे या कालावधीत राज्यात सर्वत्र समाधानकारक पावसाची शक्यता कमी आहे.

12 जूनपर्यंत राज्यात कमाल तापमान किती असेल?  

सध्याच्या हवामान अंदाजानुसार किमान 15 जूनपर्यंत विदर्भ, मराठवाडा, खान्देश, आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये दुपारनंतर ढग आणि विखुरलेल्या स्वरूपाचा मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र हा पाऊस व्यापक क्षेत्रात पेरणीस पोषक ठरेल, अशी परिस्थिती अद्याप दिसत नाही. दरम्यान, किमान 12 जूनपर्यंत राज्यातील अनेक भागांमध्ये कमाल तापमान सध्याप्रमाणेच उच्च राहण्याची शक्यता आहे. विदर्भ व खानदेशात कमाल तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक, तर मराठवाड्यात 35 ते 40 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे.

नक्की वाचा - Monsoon in Maharashtra : मान्सूनची धमाकेदार एन्ट्री, कोकणात धडकला; तुमच्या जिल्ह्यात 'रिमझिम' कधी?

कृषी व आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून शेतकरी व नागरिकांना महत्त्वाचं आवाहन...

•    आगामी वादळी पावसावर अवलंबून राहून पेरणीची घाई करू नये.
•    विजांच्या कडकडाटाच्या वेळी झाडाखाली, टिनशेडखाली तसेच विद्युत ट्रान्सफॉर्मर, वीज खांब आणि विद्युत वाहिन्यांच्या जवळ थांबणे टाळावे.
 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com