Maharashtra Rain Update : राज्यभरात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईसह उपनगरीय भागात आणि पुण्यात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. पुढील काही दिवस कोकणाचा पावसाचा जोर कायम राहणार असल्याची चिन्ह आहेत. हवामान विभागाकडून मुंबई, ठाणे, पालघर भागात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
मंगळवारी मोसमी पावसाने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे. आज गुरुवारी कोकण, पश्चिम महाराष्ट्रातही मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Pune Rain News)
आज पालघर, ठाणे, मुंबई यांना यल्लो अलर्ट देण्यात आला असून रायगड आणि रत्नागिरीमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे कोकणात पावसाचा जोर अधिक पाहायला मिळत आहे. आयएमडीने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, मुंबई २० आणि २१ जून रोजी पावसाचा जोर कमी असेल. त्यानंतर रविवारी पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. तर (Kokoan Rain Update) कोकणातील रायगड, रत्नागिरी जिल्ह्याला २० ते २२ जूनपर्यंत यल्लो अलर्ट आहे.
पुणे (घाट परिसर), सातारा, रत्नागिरी, रायगड या चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये तुफान पावसाची शक्यता असून नागरिकांना आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे.