Nandurbar News: नंदुरबार जिल्ह्याला पाणी टंचाईच्या झळा, जलसाठ्यांनी तळ गाठला, किती पाणीसाठी शिल्लक?

Nandurbar Water Crisis News: जिल्ह्यात तापमान 43ते44° c च्या वरती जात असल्याने पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग वाढला असून त्यातून धरणातील पाणीसाठा कमी होत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

प्रशांत जव्हेरी, नंदुरबार: एकीकडे उन्हाचा तडाखा वाढत असतानाच राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पाणी टंचाईच्या झळा वाढताना दिसत आहेत. राज्यातील 19 जिल्ह्यांमध्ये 800 हून अधिक टँकर्सच्या मदतीने पाणीपुरवठा होत असल्याचे चित्र दिसत आहे. वाढत्या उन्हामुळे धरणातील पाणीसाठा कमी होताना दिसत असून याचा मोठा फटका नंदुरबार जिल्ह्याला बसला आहे. जाणून घ्या नंदुरबार जिल्ह्यातील पाणीसाठ्याची चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

नंदुरबार जिल्ह्यात वाढत्या उष्णतेबरोबर धरणातील पाणी साठ्यातील बाष्पीभवनाच्या प्रमाणातही वाढ झाली असून ग्रामीण भागासाठी संजीवनी असलेल्या लघु प्रकल्पांच्या पाणीसाठा मध्ये कमालीची घट झाली असून जिल्ह्यातील 13 लघु प्रकल्पांपैकी सहा लघु प्रकल्पांनी तळ गाठला असून लघु प्रकल्पांमध्ये 28.98% पाणीसाठा शिल्लक आहे.

त्यामुळे येणाऱ्या काळात ग्रामीण भागात तीव्र पाणी टंचाईची समस्या निर्माण होऊ शकते त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावे असे आहवान प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. जिल्ह्यात तापमान 43ते44° c च्या वरती जात असल्याने पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग वाढला असून त्यातून धरणातील पाणीसाठा कमी होत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

( नक्की वाचा : कोण आहेत PM मोदींचे 7 महारथी? जे लिहिणार पाकिस्तानच्या बरबादीची कहाणी )

नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण भागातील लघु प्रकल्पांमधील पाणीसाठा आकडेवारी 

1. मेंदीपाडा 20.25

 2. देवळीपाडा  38.30

3. ढोंग 0.00

4. रकानाला  39.36

5. अमरावतीनाला 13.06

6. चौपाळे 57.54

7. घोटाणेको.प.ब.  0.00

8. सुरी 11.20

9. नेसु 48.21

10. चिरडा 53.06

11. धनपूर 56.58

12. भरुीवेल 41.71

13. ईच्छागव्हा 0.00

(नक्की वाचा-  Pehalgam Terror Attack: भारताच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तानची भंबेरी, लष्करी युद्ध सरावाला सुरुवात)