
हिंजवडी: पुण्यातील आयटी पार्क म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडीमध्ये वाहतूक कोंडी, पावसाच्या पाण्याने होणारी तुंबई आता नित्याचीच झाली आहे. रस्त्यांवर पडलेले खड्डे, तासनतास वाहतूक कोंडीत होणारी दैना अन् विविध मुलभूत समस्या इथल्या नागरिकांना भेडसावत आहेत. याचविरोधात आता हिंजवडीकरांनी आक्रमक भूमिका घेतली असून हिंजवडी माण चा समावेश नजिकच्या महापालिकेमध्ये करा, अशी मागणी केली आहे.
Sanjay Raut: 'हे बरं दिसत नाही...', राज ठाकरेंचा फोन अन् मातोश्रीवर चर्चा; कसं असेल मोर्चाचे नियोजन?
याबाबत सविस्तर माहिती अशी की, आयटीनगरी हिंजवडी माण आणि आसपासच्या गावांचा समावेश महानगरपालिकेत करावा यासाठी हिंजवडी मधील आयटीयन्स आणि ग्रामस्थ हिंजवडी मधील छत्रपती शिवाजी महाराज एकवटले आहेत. पिंपरीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये हे आंदोलन सुरु असून आम्हाला महापालिकेत सहभागी करून घ्या अशी ग्रामस्थ आणि आयटी कर्मचाऱ्यांची मागणी आहे.
हिंजवडीत आय टी हब आल्यापासून विविध मूलभूत समस्यांनी नेहमीच हा आय टी पार्क वंचित राहीला आहे. तासनतास हिंजवडीमधील वाहतूक कोंडीमध्ये आयटीयन्स वेळ घालवून कंपनीमध्ये पोचावे लागत आहेत, त्यातच रस्तावर पडलेले खड्डे, नैसर्गिक ओढे नाले बुजवल्यामुळे 4 ते 5 फुटांपर्यंत रस्तावर पाणी साचत आहे.
Hinjewadi Water Crisis: हिंजवडी आयटी पार्कचे 'वॉटर पार्क' का होते? जलकोंडीची मानवनिर्मित कारणे समोर
ग्रामपंचायत, एमआयडीसी , पीएमआरडीए या तिन्ही संस्था नेहमीच एकमेकांकडे बोट दाखवण्याखेरीच काही करत नाहीत. त्यामुळे अखेर गावकऱ्यांनी आणि आयटी अभियंत्यांनी हिंजवडी माण चा समावेश नजिकच्या महापालिकेमध्ये करण्याची मागणी करू लागलेत. याच मागणीसाठी हिंजवडीकरांनी आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world